मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल दिल्लीत भेट झाली. राज्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोदींची भेट घेतली होती. मात्र, या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दिल्लीतील भेटीनंतर दुसरीकडे राज्यात देखील भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी पावसाळी अधिवेशनात मराठा, ओबीसी पदोन्नती आरक्षणासह विविध विषयांवर ठाकरे सरकारला घेरण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजप नेत्यांची भेट म्हणजे साडेचार तासांचा कुटाणा असल्याचे म्हणत मिटकरी यांनी टीका केली आहे. अमोल मिटकरी म्हणाले की, ह्याला खलबतं नाही तर ‘कुटाणा’ म्हणतात. पावसाळी अधिवेशनात कोण कुणाला धारेवर धरतं त्यापेक्षा धारेत वाहुन कोण जातं हे महत्वाचं असेल. आज प्रधानमंत्री एक तास शांत बसुन ऐकत होते हे खलबत्यांना सहन झालं नसावं म्हणुन हा साडेचार तासाचा ‘ कुटाणा’, असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, भाजप नेत्यांच्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. तसेच, मराठा आरक्षण, ओबीसींचं राजकीय आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षणाच्या प्रश्नांवर सरकारला आगामी पावसाळी अधिवेशनात जाब विचारणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.
Read Also :
- ‘…म्हणजे मुख्यमंत्री घरी बसायला मोकळे’, भातखळकरांचा खोचक टोला
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली शरद पवारांच्या प्रकृतीबाबत विचारपूस
- ‘अमरावतीची जनता रिटेकची संधी देणार नाही, अभिनयाकडे परत फिरा’
- ‘पंतप्रधानपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?’
- ‘खासदारकीला कोणताही धोका नाही’, नवनीत राणांना विश्वास