मुंबई : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तब्बल ३६ दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतला. जवळपास महिनाभर राज्यात एकही मंत्री नव्हता. महाराष्ट्राच्या इतिहासात असे कधी झाले नाही. मात्र उशीरा का होईना शपथविधी झाला आहे. आता शपथविधीनंतर सत्कार समारंभ वगैरे महिनाभर चालवण्यापेक्षा महाराष्ट्रात संकटात असलेला आमचा शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने धाव घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री लवकरच खातेवाटप करून आणि पालकमंत्री नेमून त्यांना जिल्ह्याजिल्ह्यात पाठवतील, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
“एकही मंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतले नाही, ही वाटचाल कुठली”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे ४०-५० आमदार गेले, त्या सर्वांनाच मंत्री व्हायचे होते. जे आधीच मंत्री होते, त्यांना चांगले खाते पाहीजे होते. प्रगती प्रत्येकाला अपेक्षित असते. त्यामुळे हिंदुत्व वगैरे हा मुद्दा नव्हता. आता ज्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवले आहे. त्यांनी हिंदुत्वासाठी त्याग केला, असंच म्हणावं लागेल, अशी कोपरखळीही जयंत पाटील यांनी मारली. यासोबतच काही चुकीच्या प्रकरणांमध्ये नाव असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. हा सर्वस्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. जेव्हा विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होईल, तेव्हा आम्ही सभागृहात आमची भूमिका मांडू, असंही जयंत पाटील म्हणाले.
“भाजपला ‘गॅंग ऑफ वासेपुर’ ही उपमा देणारे महोदय आता भाजपमध्ये विसावलेय”
स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ होम मेकर असू नयेत तर त्या नेशन बिल्डर असाव्यात असं ते सांगतात, पण राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यामध्ये महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला शिंदे-फडणवीस सरकारमध्ये संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“उशीरा का होईना, पण शपथविधी झाला”; मंत्रिमंडळ विस्तारावर अजित पवारांचा टोमणा
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पहिल्या टप्प्यात शिंदे गटातील शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, दीपक केसरकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, दादा भुसे, उदय सामंत, संजय राठोड यांना संधी देण्यात आली आहे. भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे, विजयकुमार गावित यांना संधी देण्यात आली आहे.
Read also
- शिंदे-फडणवीस सरकारमध्ये 15 महिला आमदार; पुढच्या टप्प्यात कुणाला मिळणार संधी?
- पाटलांची मंत्रीपदासाठी वर्णी लागल्याने, बावनकुळेंकडे मोठी जबाबदारी, शेलारांकडे मुंबई भाजपचे अध्यक्षपद?
- “भाजपमध्ये जाताच बाकीच्या नेत्यांना गंगेमध्ये धुऊन पवित्र केलं”
- “ज्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही, त्यांना “अच्छे दिवस” आले असल्याचं समजावं”
- शिंदे सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी, अन् राष्ट्रवादीचा नव्या मंत्र्यांबाबत ‘पोस्टर वार’