पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीतील भेटीनंतर राजकीय चर्चांना राज्यात उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जे मोदी-ठाकरे यांच्या भेटीची चर्चा करतात त्यांचा अभ्यास कमी आहे आणि ही मुद्दाम केलेली चर्चा असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22व्या वर्धापनदिनानिमित्त बोलताना रोहित पवारांनी भाजपवर देखील अप्रत्यक्ष टीका केली. एक पार्टी अशी आहे, तिला नेहमी असं वाटतं की आपण राज्यात आणि देशात सत्तेत राहावं, असा अंहकार नेहमी पाहायला मिळतो, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की केंद्राची आणि राज्याची मजबुरी काय आहे. त्यावर विचार केला पाहिजे. चंद्रकांत पाटलांनी लोकांची सेवा केली पाहिजे, असा सल्ला देखील रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिला.
केंद्र सरकार गुजरातला मदत करत असेल व महाराष्ट्राला मदत मिळत नसेल, तर हे नक्कीच राजकारण असल्याचे देखील ते म्हणाले.
Read Also :
- ‘राज्याचा सहकार मोडीत काढण्याचा केंद्र सरकारचा डाव’
- Video : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने पुण्यात साकारले 53 फूट उंचीचे भित्ती चित्र
- प्राधिकरणाचा उद्देश साध्य झालेला नाही; भाजपच्या राम-लक्ष्मणाची जोडी कोर्टात जाणार
- ‘मालाडमधील घटनेत 11 लोकांचा मृत्यू ही शिवसेना शासित BMC कडून योजनाबद्ध हत्या’
- आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या एसटी महामंडळाला सरकार देणार 600 कोटी