मुंबई : तौक्ते चक्रीवादळानंतर कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौरा केला. यावेळी सर्वप्रथम त्यांनी रत्नागिरीत झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आणि नंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नुकसानीचा आढावा घेतला.
दरम्यान, त्यांच्या या तीन तासांच्या कोकण दौऱ्यावरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला असून, ‘आधी मागच्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाची नुकसान भरपाई सरकारने द्यावी; मग या चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची भरपाई देण्याच्या मोठ्या घोषणा कराव्यात. केंद्र सरकारने मदत जाहीर केली आहे, पण राज्य सरकारचे काय,’ असा सवाल विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केला आहे.
यावरून, आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नवाब मलिक यांनी परत भाजप, तसेच फडणवीसांवर ट्विट करत निशाणा साधला असून, ‘विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी आग्रह धरला पाहिजे. ती त्यांची जबाबदारी आहे. मात्र ते फक्त राज्य सरकार काय देणार यावर बोलत आहेत,’ असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला आहे.
विरोधी पक्ष नेते @Dev_Fadnavis यांनी केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी आग्रह धरला पाहिजे. ती त्यांची जबाबदारी आहे. मात्र ते फक्त राज्य सरकार काय देणार यावर बोलत आहेत, असा टोला ना. @nawabmalikncp यांनी लगावला.
— NCP (@NCPspeaks) May 22, 2021
तसेच, ‘पंतप्रधान पाहणीसाठी महाराष्ट्रात आले नाहीत. मात्र गुजरातला १००० कोटींचे पॅकेज दिले. आता जनतेने प्रश्न विचारल्यानंतर फडणवीस आमच्याकडे बोट दाखवत आहेत. आम्ही भरपाई देणार आहोत, पण फडणवीसांनी मोदींकडे आग्रह धरून राज्याला मदत मिळवून दिली पाहिजे, असे म्हणत मलिकांनी, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर पंचनाम्याच्या माध्यमातून राज्य सरकारच्या यंत्रणेला नुकसानाचा अंदाज येईल. यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफच्या स्टँडिंग ऑर्डर व्यतिरिक्त मदत देण्याची राज्य सरकार भूमिका घेणार आहे,’ असे सांगितले.
. @narendramodi पाहणीसाठी महाराष्ट्रात आले नाहीत. मात्र गुजरातला १००० कोटींचे पॅकेज दिले. आता जनतेने प्रश्न विचारल्यानंतर फडणवीस आमच्याकडे बोट दाखवत आहेत. आम्ही भरपाई देणार आहोत, पण फडणवीसांनी मोदींकडे आग्रह धरून राज्याला मदत मिळवून दिली पाहिजे.
– @nawabmalikncp— NCP (@NCPspeaks) May 22, 2021
दुसरीकडे काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत, ‘मोदींनी कोणत्याही राज्याशी भेदभाव केला नाही. गुजरातमधील नुकसानाची हवाई पाहणी केल्यानंतर त्यांनी जी मदत जाहीर केली ती संपूर्ण देशासाठी आहे. प्रत्येक राज्यातल्या मृतांच्या वारश्यांना त्यांनी प्रत्येकी २ लाखांची, तर जखमींसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना वादळामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करून अहवाल पाठविल्यानंतर तातडीने आर्थिक मदत देण्याची ग्वाहीही दिली आहे,’ असे सांगितले आहे.
Read Also :