मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका करताना, “राज्य सरकारने काही झालं की ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवणं थांबवलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी जर केंद्राने करायच्या असतील तर, राज्यांनी काय माशा मारायच्या का? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. आता याला राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा!”, अशी जोरदार टीका भाजपवर आणि विरोधी पक्षनेत्यांवर केली आहे.
फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा!
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) May 15, 2021
दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण तापले असून, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी काही महत्वाच्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत राज्यपालांची भेट घेऊन, त्यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रपतींना लिहिलेलं पत्र सुपूर्त केलं आहे, तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्राने तात्काळ कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केल्यावरून देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकारचे आभार मानत, “राज्यपालांच्या हातात काही नसताना देखील सत्ताधारी राज्यपालांना भेटत आहेत. ही सर्व नौटंकी आहे. हा सर्व टाईमपास सुरू आहे,” असा राज्य सरकारवर हल्लबोल केला आहे.
Read Also :
- सामनाच्या अग्रलेखातून भाजपा नेते शिवराजसिंह चौहान यांच्या अनाथ मुलांसाठीच्या घोषणेचे स्वागत
- ‘शिवसैनिक शरद पवार गेल्याची दुःखद बातमी आली… मी नि:शब्द झालो’
- ‘खिजगणतीत नसलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना मोदी NPA वाटणे स्वाभाविक’
- अजून किती लोकांचा बळी घेणार आहात?, राजू शेट्टींचा ठाकरे सरकारला सवाल
- ‘अशोकराव, आम्ही सत्ता तुमच्यासारखी चोरून आणली नाही’