पुणे : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद चर्चा करण्यासाठी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील अन् शंभूराज देसाई यांचा कर्नाटक दौरा अचानक रद्द केल्याने पुन्हा वाद निर्माण झाला आहे. मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्यांनी सध्या कर्नाटक येऊ नये असं सांगितले आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“सावध रहा, त्या बुरसट रूढींना पुन्हा परत आणण्याचा काही प्रवृत्ती प्रयत्न करताहेत”; जंयत पाटील
देशात महाराष्ट्राची आदरयुक्त भीती असताना आज शेजारच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच आपले मंत्री दौरा रद्द करतात. इतकी लाचारी का आणि कोणासाठी? आगामी निवडणुका बघता अशा भूमिका घेण्यासाठी दबाव असेलही, पण त्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेची किमंत मोजणं आणि स्वाभिमान गहाणं टाकणं योग्य नाही. असा टोला रोहित पवारांनी लगावला.
“आता बेळगावसाठी मुख्यमंत्री नवस का करत नाही”; ठाकरेंचा शिंदेंना टोला
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, सत्तेच्या धुंदीत असलेल्या सरकारला याचा विसर पडलेला दिसतो. दुसरीकडे महाराष्ट्रात भर कार्यक्रमात गोळीबार, शिवीगाळ करणारे, महिलांविषयी अपशब्द वापरणारे, चुनचून के मारण्याची आणि अरे का कारे ने उत्तर देण्याची भाषा करणारे आता कुठे गेले असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
“बच्चू कडूंची अवस्था म्हणजे, नोकरीवर आहे, पण साहेबांनी सक्तीच्या रजेवर पाठवलं”
दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्री परवानगी न दिल्याने राज्यातील दोन मंत्र्यांनी आपला कर्नाटक दौरा पुढे ढकलला आहे. यातच तुम्ही जात नसेल तर आम्ही जातो, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. तर यावरून आता विरोधक सत्ताधारी पक्षावर टिकास्त्र सोडत आहेत.
देशात महाराष्ट्राची आदरयुक्त भीती असताना आज शेजारच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच आपले मंत्री दौरा रद्द करतात. इतकी लाचारी का आणि कोणासाठी? आगामी निवडणुका बघता अशा भूमिका घेण्यासाठी दबाव असेलही, पण त्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेची किंमत मोजणं आणि स्वाभिमान गहाण टाकणं योग्य नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 5, 2022
Read also
- “मोदी सत्तेत आल्यानंतर देशात अंधार झाला”; युवा संवाद कार्यक्रमात ‘आप’चा मोदींवर हल्लाबोल
- अजब प्रेम की गजब काहाणी.! 2 जुळ्या बहिणींनी एका तरूणासोबत लग्न केल्याने गुन्हा दाखल..! महिला आयोग चौकशी होणार?
- “आमच्याकडे एक सुशी ताई, पण वरच्या मजल्यावर घनदाट अंधार”; मनसेची खोचक टिका
- “शिवसेना फुटण्यापेक्षा जास्त वाढली..!” संत सेवालाल महाराजांचे पाचवे वंशज ठाकरे गटात
- “आता एकत्र आलं पाहिजे, कारण मिधें सरकार खुर्चीसाठी दिल्लीश्वरांचे पाय चाटताहेत”; उद्धव ठाकरे