अहमदनगर: आमदार निलेश लंके कोविड सेंटरमुळे चांगलेच चर्चेत आलेले. अनेक मंत्री आणि इतरही पदाधिकाऱ्यांनी निलेश लंकेच्या कोविड सेंटरला भेट दिलेली आहे. निलेश लंके यांच्या समाजकार्याची दखल दस्तुरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्यासह राज्यातील इतर नेत्यांनी देखील घेतली आहे. निलेश लंके यांच्या कोविड सेंटरमधून राज्यातील अनेक लोक उपचार घेऊन बरे होऊन गेलेले आहेत. कोरोनाच्या संकट काळात आमदार निलेश लंके यांनी दिल्लीही गाजविली.
हे पण वाचा, साई संस्थानच्या अध्यक्षपदी आमदार निलेश लंके यांची नियुक्ती करण्यासाठी ‘या’ ग्रामपंचायतीने मांडला ठराव
हे पण वाचा, साई संस्थानाच्या अध्यक्षपदाबाबतीत सत्यजित तांबे व आशुतोष काळे यांच्या नावासाठी मुबंईत खलबतं
महाराष्ट्र राज्य सोडले तर हरियाणा आणि इतरही काही राज्यांमधून नेते, कार्यकर्ते थेट कोविड सेंटरचे मॅनेजमेंट पाहण्यासाठी निलेश लंके यांच्या पारनेर-नगर मतदारसंघात धडकले. कोरोनाच्या संकट काळात अनेक आमदारांनी घरात बाहेर न पडण्यास प्राधान्य दिले मात्र आमदार निलेश लंके यांनी आपले घर कधी गाठलेच नाही. कोविड सेंटरमध्येच मुक्काम करणे, कोविड झालेल्या पेशन्टची काळजी घेणे, स्वतः जाऊन ऑक्सिजन चेक करणे, रेमडीसीवर मिळूवुन देणे, आवश्यक असल्यास आयसीयू बेडची व्यवस्था करणे इतकंच काय तर जेवण देखील आमदार निलेश लंके यांनी कोविड सेंटरमध्ये करणेच पसंद केले.
हे पण वाचा, अजित पवारांच्या अज्ञात वासाचे केंद ‘अंबालिका’त भेट झाल्याचे वृत्त माजी मंत्री राम शिंदे यांनी फेटाळले
हे पण वाचा, गोपीचंद पडळकरांचा कर्जत-जामखेड मधील थेट वावर राम शिंदेची डोकेदुखी वाढवणारा
अहमदनगर जिल्ह्यात १२ आमदार असताना आमदार निलेश लंके यांचे नाव जिल्ह्यात सर्वात जास्त चर्चिले गेले. त्यांच्या कामांच्या धडाक्यामुळे जिल्ह्यातील जनता आणि कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांबाबद उघड नाराजी व्यक्त केली. लंके करू शकतात तर तुम्हाला काय झाले असे प्रश्न देखील विचारण्यात आले. कोविड ची लाट जशी ओसरली तशी लंके यांची मुंबईकडे धाव वाढली आणि मतदार संघासाठी या पहिले कधी न आणता आलेला निधी त्यांनी आणला. श्रीगोंदा, नगर, अहमदनगर, पारनेर, राहुरी, कर्जत जामखेड सगळीकडेच तरुणाईने निलेश लंके यांना डोक्यावर घेतले आणि त्यांचेच स्टेस्टस सोशल मीडियावर दिसू लागले. आगमी काळात आणि आता देखील निलेश लंके अनेकांच्या डोळ्यात खुपायला लागले आहेत. जनतेचा आशीर्वाद असणाऱ्या निलेश लंकेच्या बाबतीत आता राजकीय नेते गर्भघळीत झाल्याने आगामी काळात निलेश लंकेंमुळे काय घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुस्त्याचे ठरणार आहे.
हे पण वाचा,
साई संस्थानाच्या अध्यक्षपदाबाबतीत सत्यजित तांबे व आशुतोष काळे यांच्या नावासाठी मुबंईत खलबतं
अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे
“निळवंडे धरणाच्या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही” जलसंपदा मंत्री जयंत पाटील