मुंबई – निवडणुक आयोगाने राज्यसभांच्या ५१ जागांची निवडणुक प्रक्रिया जाहीर केली आहे. महाराष्ट्रात एकूण ६ जागांसाठी राज्यसभेची निवडणुक होत आहे. यासाठी राज्यात राजकीय पक्षांमध्ये मोठी चुरस बघायला मिळणार आहे. महाविकास आघाडी आणि भाजप मिळून पाच जागा होतात. तसेच सहाव्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजी राजे यांनी अपक्ष निवडणुक लढविणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र शिवसेने आडकाठी भूमिका घेत सहावी जागा शिवसेनेचीच असं आज संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“यांना रावणांची देखील उपमा देऊ शकत नाही”, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टिका
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारीसाठी पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, त्यासाठी एक अटही ठेवली आहे. राष्ट्रवादीची एक जागा निवडून आल्यानंतर राहिलेली मते छत्रपती संभाजीराजेंना देणार असल्याचे पवार यांनी म्हटले होत. यावरून आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद पेटण्याची शक्यता होती. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मला राज्यसभेवर सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन पाठवावे, असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केले होते. मात्र, महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा देण्यास नकार दिला. शिवसेना सहाव्या जागेवार उमेदवार उभा करणार असे सांगितले.
“शिवसंपर्क अभियान नव्हतं तर शिव्या संपर्क भाषण होतं”
या सर्व घडामोडीनंतर आता विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. दरम्यान, आता भाजपाचे निलेश राणे यांनी संभाजीराजे छत्रपतींना सल्ला दिला आहे. यासंदर्भात निलेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी ज्यसभेला अपक्ष उभे राहणार अशी घोषणा केली. लगेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आमची उरलेली मतं राजेंना देऊ असं सांगून राजेंना अडचणीत टाकलं आहे. उरलेली मतं राजघराण्याला? राजे, यांचा डाव ओळखा आणि आत्ताच योग्य तो निर्णय घ्या कारण हे पवार मराठ्यांचे कधीच झाले नाहीत, असा खोचक टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला आहे.
शरद पवार लवकरच राष्ट्रीय राजकारणात; दिलीप वळसे पाटील यांनी दिले तिसऱ्या आघाडीचे संकेत
कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज राज्यसभेला अपक्ष उभे राहणार अशी घोषणा केली आणि लगेच पवार साहेबांनी आमची उरलेली मतं राजे ना देऊ सांगून राजेंना अडचणीत टाकलं. उरलेली मतं राजघराण्याला?? राजे, यांचा डाव ओळखा आणि आत्ताच योग्य तो निर्णय घ्या कारण हे पवार मराठ्यांचे कधीच झाले नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 18, 2022
दरम्यान, संभाजीराजेंनी महाराष्ट्रातील सर्व विधानसभा आमदारांना खुलं पत्र लिहिले असून निवडणुकीत विजयी होण्यासाठी सर्वांच्या मदतीची आवश्यकता असल्याचे संभाजीराजे यांनी पत्रातून नमूद केलं आहे. भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीनं आपल्याला मदत करावी, अशी विनंती संभाजी राजेंनी घातली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेली शिकवण आचरण करीत राजकारण विरहित कार्य करीत आलो असल्याचेही ते म्हणाले आहेत.
Read also:
- “OBC आरक्षणासाठी केंद्राचा कोणताही संबंध नाही, फक्त प्रस्थापितांच्या आघाडीला देण्याची इच्छा नाही”
- ताईंनी लेन्स बदलून आघाडीत आल्या तर बंर होईल; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंना खुली ऑफर
- “महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासहीत निवडणुका होणार”, भुजबळांनी व्यक्त केला विश्वास
- राऊत- सोमय्या वाद चिघळला; किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांची याचिका कोर्टात दाखल..
- OBC आरक्षणाला झारीतल्या शुक्राचार्यांचा विरोध; बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा