आज सारथीच्या संदर्भात मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गोंधळ पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीराजे यांना सभागृहात खाली तिसऱ्या रांगेत बसवण्यात आल्याने मराठा समन्वयक आक्रमक झाले. राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले आहेत. संभाजीराजेंना तिसऱ्या रांगेत स्थान दिल गेल्यामुळे निलेश राणे देखील आक्रमक झाले त्यांनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत
राणे म्हणाले.” सारथी संस्थेला भरीव आर्थिक निधीची मागणी मराठा समाज सातत्याने करतोय. या बैठकीला संभाजीराजेना तिसऱ्या रांगेत बसण्याचं कारण या सरकारला एवढा माज आलाय कि त्यांना इतरांची किंम्मत कळत नाही. निषेध करतोच पण मराठ्यांना पण कळलं पाहिजे तलवारी कधी काढायच्या आणि तह कधी करायचा.” अशा शबत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे
तसेच “सारथीच्या बैठकीमध्ये झालेला गोंधळ हा राज्य सरकारला जाणून-बुजून घालायचा होता असं दिसतं. महाराष्ट्रातून आलेले मराठा समाजाचे प्रतिनिधी बाहेर ठेवून त्यांना बोलायला न देता फक्त संभाजीराजेंना एका चेंबरमध्ये बसून मीटिंग करण्यात आली, सारवासारव पत्रकार परिषद झाली आणि सरकारने पळवाट काढली.” असेही निलेश राणे म्हणाले
“जर मराठा समाजाच्या सगळ्या प्रतिनिधींचं ऐकायचं नव्हतं तर मीटिंग का बोलावली. उपमुख्यमंत्री अजित पवारांना जेव्हा प्रतिनिधींनी विचारलं संभाजीराजेंना मागे का बसवता तर ते म्हणाले राज्यसभेत पण राजे मागेच बसतात. अपमान करण्यासाठी सारथीची बैठक लावली होती का??” असा सवाल करत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला