येत्या ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा भूमीपूजनचा सोहळा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार की नाही याबद्दल राऊत यांना विचारलं असता त्यांनी निमंत्रणाची गरज नसल्याचं म्हटलं आहे.
शिवसेनेचं अयोध्येशी खास नातं आहे. त्यामुळे अयोध्येला जाण्यासाठी उद्धव ठाकरेंना कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही, असं मत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
त्यांनतर शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्वस्तांना पत्र लिहून “कोणतंही राजकारण न करता शिवसेनाप्रमुखांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला निमंत्रित करा, असं म्हटलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी राम मंदिर लढ्यात शिवसेनना अग्रस्थानी असल्याची आठवण ट्रस्टला करुन दिली.
या सर्व प्रकरणावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. “निमंत्रणाची गरज नाही तर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला उध्दव ठाकरेंना निमंत्रित करा असे राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्वस्तांना पत्र लिहून भिक का मागितली???” अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
निमंत्रणाची गरज नाही तर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला उध्दव ठाकरेंना निमंत्रित करा असे राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्वस्तांना पत्र लिहून भिक का मागितली??? https://t.co/5pSnOqgVnY pic.twitter.com/fYydjGuviR
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 20, 2020