मुंबई – हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक प्रश्नांना उत्तर देतानाच तुफान फटकेबाजी केल्याचे चित्र पहायला मिळालं. मात्र आता यावरुनच भाजपाचे नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकारण सोडून शेती करणार होतात त्याचं काय झालं?, असा प्रश्न निलेश राणे यांनी अजित पवारांना विचारला आहे.
“तीन पक्षांचे सरकार आले आणि हाता तोंडचा घास गेल्याने दु:ख झालंय अशं आज अजित पवार बोलले. अजित पवार साहेब तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये रडता, मोबाईल बंद करुन लपून बसता. बिन खात्याचे तीन महिने मंत्री राहण्याचा मानही तुमचाच. तुम्ही इतके दु:खात होतात की राजकारण सोडून शेती करणार होतात. त्याचं काय झालं?,” असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे.
३ पक्षाचे सरकार आले आणि हाता तोंडाचा घास गेल्याने दुःख झालंय असं आज अजित पवार बोलले. अजित पवार साहेब तुम्ही PC मध्ये रडता, मोबाईल बंद करून लपून बसता, बिन खात्याचे ३ महिने मंत्री राहण्याचा मान तुमचाच. तुम्ही इतके दुःखात होतात की राजकारण सोडून शेती करणार होतात त्याचं काय झालं??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 15, 2020