मुंबई : काल संजय राऊतांनी काँग्रेस बद्दल बोलताना, तृणमूल काँग्रेसने प.बंगालमध्ये मारलेली जोरदार मुसंडी बघता, आगामी काळामध्ये ममता बॅनर्जी यांनी देशात, विरोधी पक्षाचा भक्कम चेहरा म्हणून पुढे यावं, भक्कम आघाडी उभी करून, भाजपसमोर मोठं आव्हान उभं करावं, अशी सगळ्यांची इच्छा आहे. या आघाडीचा आत्मा नक्कीच काँग्रेस पक्ष असेल. देशात काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही. मात्र, काँग्रेसने अजून मुसंडी मारणं जास्त गरजेचं आहे,” असं म्हटलं होतं.
याला आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्त्युत्तरादाखल, संजय राऊत जे काही बोलतात त्याकडे आम्ही लक्ष देत नाही. तसेच आम्ही सामना देखील वाचत नाही. संजय राऊत हे नेहमीच इतरांवर टीका करत असतात, पण कदाचित संजय राऊत यांना याची जाणीव नसावी की, केवळ दुसऱ्यांवर टीका केल्याने आपला पक्ष वाढत नसतो, असा सणसणीत टोला लगावला.
दरम्यान, त्यांच्या या विधानाचा दाखल घेत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनला बोचऱ्या शब्दात आव्हान दिले आहे. “नानांनी कचराच करून टाकला… आम्ही जिथे कमी पडलो ते काम नानांनी करून टाकलं. संज्या राऊतला काडीची किंमत कुठेच नाही. असेल हिम्मत शिवसेनेत तर उद्याचा सामन्यात किंव्हा एक तरी शिवसेनेच्या मंत्र्याने ह्यावर जशास तशी प्रतिक्रिया द्यावी. बघुया शिवसेनेची औकात किती उरली आहे.” असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
नानांनी कचराच करून टाकला… आम्ही जिथे कमी पडलो ते काम नानांनी करून टाकलं. संज्या राऊतला काडीची किंमत कुठेच नाही. असेल हिम्मत शिवसेनेत तर उद्याचा सामन्यात किंव्हा एक तरी शिवसेनेच्या मंत्र्याने ह्यावर जशास तशी प्रतिक्रिया द्यावी. बघुया शिवसेनेची औकात किती उरली आहे. https://t.co/dfSZVoOJMH
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 10, 2021
Read Also :
- “नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही”; नवाब मलिकांची केंद्रावर टीका
- “हे तर पाकीटमार आणि खिसेकापू सरकार”, नवाब मलिकांचा मोदी सरकारवर घणाघात
- उजनीचे पाणी पेटले, पालकमंत्र्यांसमोरच भिडले सोलापूर आणि इंदापूरचे शेतकरी
- “आम्ही संजय राऊत यांना गांभीर्याने घेत नाही”, – नाना पटोले
- महामारी, तिसरी आघाडी आणि काँग्रेसवर संजय राऊतांचे मोठे भाष्य, म्हणाले…