निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात झालेल्या नुकसानीनंतर राज्य सरकारने अद्याप केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवलेलाच नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाविकासआघाडी सरकारने अद्याप केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवलेला नाही. राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यानंतरच केंद्र सरकार कोकणाला मदत करण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
यानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी देखील शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘राज्य सरकारने कोकण चक्रीवादळ प्रस्ताव केंद्राला अजून पाठवलेला नाही. यांना कोकणावर किती प्रेम आहे हे दिसून आले.. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे दौरे फक्त फोटो काढण्यापूरतेच होते.. हे सिद्ध झाले ! मा. बाळासाहेब म्हणायचे कोकण शिवसेनेचा कणा आहे.. उद्धव ठाकरेंनी कणाच मोडून टाकला’ ! अस ट्विट करत नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्य सरकारने कोकण चक्रीवादळ प्रस्ताव केंद्राला अजून पाठवलेला नाही !!
यांना कोकणावर किती प्रेम आहे हे दिसून आले..
मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे दौरे फक्त फोटो काढण्यापूरतेच होते.. हे सिद्ध झाले!!मा. बाळासाहेब म्हणायचे कोकण शिवसेनेचा कणा आहे..
उद्धव ठाकरेंनी कणाच मोडून टाकला!!!— nitesh rane (@NiteshNRane) July 18, 2020