मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली. या सरकारने दोन वर्षांत केलेल्या कामांवर विरोधकांनी सातत्याने टीका केली आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यातच आता शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपामध्ये येण्याची ऑफर दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे यांना ठाकरे सरकारने रोखून धरले आहे. उद्धव ठाकरे हे आपल्या मुलाला मुख्यमंत्री करतील त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाजपामध्ये यावे, असे आवाहन त्यांनी केले. सोबतच खासदार संजय राऊत यांच्यावरसुद्धा राणेंनी टीका केली. संजय राऊतांना मुख्यमंत्री पदांची स्वप्न पडत असल्याचे राणे म्हणाले.
जळगांव जिल्हा बँक निवडणूकीत भाजप ‘धाराशिव’; महाविकास आघाडीचा २० जागांवर दणदणीत विजय
राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली. मराठा आरक्षणाच्याबाबतीत महाविकास आघाडी सरकारने काय भूमिका घेतली, हे सर्वांनी पाहिले आहे. राज्यात टाच आली तरी ते केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. संसदेत कायदा पारित झाला. त्यामुळे आता सगळे अधिकार राज्य सरकारचे आहेत. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले गेले. देवेंद्र फडणवीसांनी सक्षम आरक्षण दिले होते. ठाकरे सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडायला हवी होती, असे नितेश राणे म्हणाले.
Read Also :
- संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला; ST संपाबाबत चर्चा?
- आटपाडी राडा प्रकरण भोवणार?; अटकेपासून वाचण्यासाठी पडळकरांची उच्च न्यायालयात धाव
- ‘शरद पवार यांच्या घरी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी बैठक झाली तर वावगं काय?’ आव्हाडांचा रोखठोक सवाल
- सातारा जिल्हा बँकेत दोन दिग्गज नेत्यांचा निसटता पराभव; आमदार शशिकांत शिंदे, राज्य गृहमंत्री देसाई थेट पराभूत
- आमदार महेश लांडगेंची मानवता : संपकरी एसटी कामगारांच्या घरचे भरले ‘राशन’