देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन केले जात आहे. लॉकडाऊन करणे हा उपाय नसल्याचे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नितीन गडकरी म्हणाले की, कोरोनाचं संकट आज जगावर आहे. या संकटाचा सामना हिमतीने करण्याची गरज आहे. कोरोनासोबत जगण्यासाठी सकारात्मक आणि आत्मविश्वास सगळीकडे निर्माण करण्याची आवश्यकता आहे
ते म्हणाले की, कोरोनाचे संकट आहे पण लॉकडाऊन सुरु ठेवणे बंद केले पाहिजे. आज लॉकडाऊनमुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे कोरोनापासून बचावाचे नियम पाळून आपण जनजीवन सुरळीत केले पाहिजे.