मुंबई: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बंद पडलेले विदर्भातील दोन सहकारी साखर कारखाने विकत घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम काही वर्षांपूर्वी केले होते. मात्र भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीतर्फे साखर कारखान्यांच्या विक्रीची सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी करण्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केलेल्या मागणीत या दोन्ही कारखान्यांचा देखील समावेश आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ३० जुलै रोजी अमित शहा यांना पाठविलेल्या पत्रासोबत ३० साखर कारखान्यांची यादी जोडण्यात आलेली आहेत.
१९९५ मध्ये नितीन गडकरी यांनी पूर्ती समूहाच्या बॅनरखाली विदर्भात साखर उद्योगात पदार्पण केले. पूर्ती पॉवर अँड शुगर लिमिटेड (आता पुर्ती ग्रुप) म्हणून काम सुरू केले, जेव्हा त्यांनी महाराष्ट्रात पीडब्ल्यूडी मंत्री म्हणून काम सुरू केले.
हे पण वाचा, पारनेर कारखाना पुन्हा सहकारात रुजू करण्यासाठी आमदार निलेश लंकेचे एक पाऊल पुढे
यावरून आता वातावरण तापायला लागल्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घुमजाव केले आहे. मी पाठवलेलं एक पत्र होतं वाझेसंदर्भात आणि सचिन वाझेंच्या स्वतःच्या हस्ताक्षरात एनआयए न्यायालयात जे पत्र दिलं त्याची सीबीआय चौकशी करा असं मी म्हणलो होतो. परमबीर सिंगांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्राची सीबीआय चौकशी होते मात्र वाझेंनी एनआयए न्यायालयाच्या न्यायाधीशांना लिहलेल्या पत्रात अनिल परब, अजित पवार यांनी नाव होती आणि त्यांची सीबीआय चौकशी करावी असे मागणी करणारे पत्र मी लिहले होते.
हे पण वाचा, अहमदनगर जिल्ह्यातील ‘पारनेर साखर कारखाना’ चौकशीच्या भोवऱ्यात
हे पण वाचा, अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश
दुसरं पत्र जरंडेश्वर साखर कारखाना ईडीने जप्त केल्यानंतर दिलं होतं. यामध्ये दोन साखर कारखाने नितीन गडकरी यांनी विकत घेतले होते. यासंदर्भात उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाली होती आणि तेव्हा नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. बँकांनी ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा कितीतरी जास्त पैसे देऊन हे कारखाने विकत घेतले असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं होतं. यामुळे मी नव्याने काही म्हणलो नाही तर यादी घेऊन त्या कारखान्यांची चौकशी करा अशी मागणी केली. त्यामुळे मी केलेली योग्य मागणी चुकीच्या पद्धतीने दाखवू नका असे देखील ते म्हटले आहेत.
हे पण वाचा,
- ED च्या कचाट्यात सापडलो म्हणून पळून जाणार नाही; प्रताप सरनाईक पहिल्यांदाच आले समोर
- ठाकरे सरकारकडून लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम, देवेंद्र फडणवीस आक्रमक
- नितीन गडकरींच्याही कारखान्यांची ईडी चौकशी होणार? केंद्रीय गृहमंत्र्यांना दिलेल्या पत्रात चंद्रकांत पाटलांनी केली आहे मागणी
- सरकारने लोकशाहीला कुलूप लावलं; MPSC वाल्या विद्यार्थ्यांचे तीन तेरा वाजले – फडणवीस आक्रमक
- सरकारची पाठराखण करण्यासाठी चमचेगिरी करू नका; सुधीर मुनगंटीवार सत्ताधाऱ्यांवर भडकले