भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थानपाठोपाठ महाराष्ट्रातही ‘ऑपरेशन कमळ’ची राजकीय चर्चा रंगली. परंतु, फडणवीस यांनीच ही शक्यता फेटाळून लावली. तर काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ‘फडणवीसांना राज्यात शेवटी कटोरं घेऊन फिरावं लागेल’ अशी सडकून टीका केला आहे.
महाराष्ट्र सरकारचं चांगल्या स्थितीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगलं काम करत आहे. आमचे आमदार खुश आहे, त्यामुळे हे सरकार पाच वर्षे चालणार आहे. शेवटी देवेंद्र फडणवीस यांना कटोरा घेवून फिरावं लागेल’ अशी सडकून टीका राऊत यांनी केली.
तसंच, ‘राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी गेल्या आठवड्याभरापासून प्रयत्न सुरू होता. भाजपनं आमदार विकत घेऊन सरकार पडण्याचं षडयंत्र रचलं होतं, पण यात त्यांना यश आलं नाही’, असं भाष्य राउत यांनी केलं.