नागपूर : मराठा आरक्षणापाठोपाठ सुरू झालेलं ओबीसींचं आंदोलन आता व्यापक रूप घेत असून, राज्यातील सरकारमध्ये असलेले ओबीसी नेते देखील आता या मुद्द्यावरून आपला आवाज उठवताना दिसून येत आहेत. यातच आज, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, या अनुषंगाने मोठं विधान केलं असून, “आम्ही मंत्री असलो, तरी हा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे. आज प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली.
हे पण वाचा, …शरद पवारांच्या राजकारणाचा अस्त होतोय; गोपीचंद पडळकरांचा दावा
तसेच, “निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून, ती चर्चा सकारात्मक होती. ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ नये, या मुद्दयावर आम्ही ठाम आहोत. या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी, येत्या २६ आणि २७ जूनला, लोणावळ्यात चिंतन बैठक होणार आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
हे पण वाचा, प्रशांत किशोर- शरद पवार यांच्यात खलबतं सुरु, राज्यात लवकरच राजकीय वादळ?
यावेळी, आमदार प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया देताना त्यांनी, “काहीही झालं तरी पुढचे साडेतीन वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार आहेत. त्यामुळे, कितीही ईडी आणि सीबीआयचा दबाव आणला, तरी तुम्ही स्वप्न बघत राहा. आमची वाटचाल अशीच सुरू राहील. माझ्यामते, केंद्रीय संस्था कशाप्रकारे वागत आहेत, हे दाखवण्यासाठीच सरनाईक यांचे हे पत्र आहे,” असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला.
Read Also :
- “प्रताप सरनाईकांबद्दल आम्हाला सहानुभूती, त्यांच्या पत्रातून त्यांचा छळ होत आहे.”
- “भुजबळ खुर्चीवर बसले आणि…”, नाशिकमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलनात झाला गोंधळ
- “राष्ट्रवादी व काँग्रेसने, मोठ्या मनाने शिवसेनेला सांभाळून घेतलंय, त्यांच्या हे लक्षात असावं”
- “नवी मुंबई विमानतळाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हेच नाव पाहिजे”- राज ठाकरे
- युती होऊ शकते, मात्र आता निर्णय शिवसेनेनं घ्यायचा आहे- गिरीश बापट