मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्त भागातील नुकसान भरपाईबाबत चर्चा झाली. मात्र अद्याप नुकसान भरपाईचे नेमके आकडे समोर न आल्याने अंतिम निर्णय होऊ शकला नाही. सध्या तात्काळ मदत म्हणून पूरग्रस्तांना दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
हे पण वाचा: पुण्यातील रिंग रोडसाठी कोणत्याही प्रकारचा टोल घेतला जाणार नाही; एकनाथ शिंदे यांची माहिती
महाराष्ट्रात तुफान पाऊस आणि दरड दुर्घटनामुळे मोठं नुकसान झालं आहे. जवळपास दहा जिल्ह्यांमध्ये पुराने थैमान घातलं. त्यामुळे पूरग्रस्तांना नियमांच्या पलिकडे जाऊन मदत करण्याची भूमिका ठाकरे सरकारने घेतली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत NDRF च्या निकषांपलिकडे जाऊन कशी मदत करता येईल याबाबत चर्चा झाली. NDRF च्या निकषांनुसार दिली जाणारी मदत कमी आहे. मात्र झालेलं नुकसान हे जास्त असल्याने नियम बदलून मदत दिली जाणार आहे.
हे पण वाचा: “आता देशाला ‘सच्चे दिन’ दाखवण्याची गरज, सर्व विरोधक एकत्र आले तर ६ महिन्यातच परिणाम दिसतील”
दरम्यान, ठाकरे सरकारने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत खासगी शाळांच्या फीमध्ये १५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे १५ टक्के शुल्क कमी करावी असे आदेश दिले होते. तसेच कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिले होते. कोर्टाच्या निर्णयानंतर खासगी शाळांच्या १५ टक्के फी कपातीचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
हे पण वाचा: प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई होणार? उच्च न्यायालयाने दिले ईडीला आदेश
महाडमध्ये NDRF बेस कॅम्पची मागणी
महाडच्या तळीयेमध्ये दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर कोकणात एनडीआरएफचं बेस कॅम्प असावं या मागणीने जोर धरला आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही महाडमध्येच एनडीआरएफ किंवा एसडीआरएफचं बेस कॅम्प असावं अशी मागणी केली आहे. महाडमध्येच बेस कॅम्प का असावं याची कारणमिमांसाही आदिती तटकरे यांनी केली आहे.
Read Also :
- अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या, १२ ठिकाणांवर सीबीआयने जलदगतीने टाकले छापे
- राज्य सरकारकडून १४ जिल्ह्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याच्या हालचाली सुरु
- भाजपाला सत्तेपासून रोखण्यसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केले देशपातळीवर प्रयत्न सुरु
- “फडणवीसांनी उठसूठ बोलण्यापेक्षा अभ्यास आणि संशोधन करून बोलावं”
- नाशिक नोटप्रेस चोरी प्रकरणाचा झाला उलगडा; हाय सिक्युरिटी असूनही गेल्या होत्या ५ लाखांच्या नोटा चोरीला