पुणे : औरंगाबाद येथे बोलताना उद्धव ठाकरे यांनी पाणी प्रश्नावरून भाजपवर हल्लाबोल केला. पहिल्यांदा पाणी प्रश्नावर बोलणार कुठेही फसवेगिरी नाही. हा प्रश्न बिकट होता. आता सुधारणा झाली की नाही? जूनी योजना हातात दंडा घ्या आणि पहिले संभाजीनगरला पाणी द्या. जुन्या योजनेसाठी समांतर योजनेला पैसे देणार. कोरोनात वर्ष गेली. पण आता किंमती वाढल्या खर्च वाढणार पण शासनाने याची जबाबरदारी घेतली. कंत्राटदार अडून बसला तर सरळ तुरूंगात टाका, असा इशाराही त्यांनी दिला. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टिका केली.
“लाचार संजय राऊत यांना ‘स्मृतीभ्रंश’ झालाय”; ‘त्या’ व्यक्तव्यावरून मनसेचा राऊतांना टोला
औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांची काल राजकीय सभा पार पडली. त्यावेळी शिवसेनेच्या अनेक नेत्यांची जोरदार भाषणं झालीत. ना पाणी प्रश्नावर ठोस भूमिका, ना हिंदुत्वावर, ना शहराच्या नामांतरणावर, ना हुंकार फक्त लावंगीच्या फुसक्या माळा, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टिका केली आहे.
देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह ;संजय राऊत म्हणाले..;
त्याचबरोबर आक्रोश मोर्चा सत्ता गेली म्हणून पाण्यासाठी नाही. तुम्ही किती पैसे दिले तेव्हा. आम्हाला खोट बोलणे शिकवलेले नाही. रस्त्यासाठी निधी दिलेला नाही. कामाला हात घायलाय सुधारताहेत. छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण, म्युझियम, अगदी मेट्रोसाठी पण गरज पडली तर मेट्रो करू विध्दंवसक नाही, शहराची शान वाढवणारे काम आपण करू हे वचन, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
“तर आता सगळ्या स्पर्धा परीक्षा गाजवणाऱ्या मुली दिसल्या असत्या का ?”
बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही, पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही, त्यांनी दुसर्यांना ‘अच्छे दिन’ सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि…! माझे पुन्हा सवाल आहेत, शेतकर्यांना मदत केव्हा करणार? पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार? असो, संभाजीनगरचे नामकरण, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, विकासाची एखादी नवीन योजना… काही तरी ठोस मिळेल, अशी उगाच त्यांची अपेक्षा होती. पण, संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे, असं टोमणा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
Read also:
- “भाजपवाले चॉकलेट दाखवून पुढेही तुमचा वापर करतील”
- “चहापेक्षा किटली गरम”; त्यावरून भाजपचा उद्धव ठाकरे, राऊतांना टोला
- अखेर नाथाभाऊंचा राजकीय वनवास संपला; राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर उमेदवारी जाहीर
- फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा मापच काढला; म्हणाले, त्यांनी दुसर्यांना ‘अच्छे दिन’..;”
- विधान परिषदेसाठी पिंपरी-चिंचवडमधून कोणाला मिळणार संधी? राष्ट्रवादीच्या इच्छुकांची जोरदार ‘फिल्डिंग’