अदमदनगर : आतापर्यंत राष्ट्रवादीचा पाठींबा होता, परंतू महापौर पदाच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देता तटस्थ राहावे, असे सांगून महापौर पदासाठी आता फरपट नकोच, अशा शब्दात भाजप पदाधिकारी, नगरसेवकांनी भावना व्यक्त केल्या. महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली विळदघाट येथे शहर भाजपचे पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक बुधवारी झाली.
या बैठकीस शहरातील भाजप नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला विखे यांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाकडे महापौर पदासाठी उमेदवार नाही. तसेच सत्ता स्थापनेसाठी पुरसे संख्याबळ नाही. मागील अडीच वर्षे राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने महापालिकेत भाजपची सत्ता आली. सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपाला महापौर व उपमहापौर पद मिळाले.
परंतु यापुढे कुणाच्याही मागे फरपटत न जाता तटस्थ राहावे, अशी भावना पदाधिकाऱ्यांची व्यक्त केली. त्यानंतर नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली. पक्ष जो आदेश देईल, तो सर्वांना मान्य राहील. पक्षाने महापौर निवडणुकीबाबत निर्णय घ्यावा, असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले असल्याचे समजते.
आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार
राज्यात पहिल्यांदाच तीन प्रमुख पक्ष एकत्र येऊ महाविकास आघाडीचं सरकार बनलं आहे. भाजपा नेत्यांकडून सातत्याने हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, लवकरच पडणार अशी टीका केली जात आहे. मात्र, कोरोना विरुद्धच्या लढाईचा सामना करत सरकार काम करत आहे. पण, अनेकदा या सरकारमध्ये मतभेद दिसून येत आहेत. त्यामुळे, आगामी निवडणुका जागावाटप करुन एकत्रच लढतील का?, हा मोठा प्रश्न आहे. त्यातच, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.