पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊनची गरज नसल्याचे सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अहमदनगरला लॉकडाऊनची कोणतीही गरज नाही. प्रशासनाने सर्व खबरदारी घेतल्याचं मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं आहे. नागरिकांनीच योग्य ती खबरदारी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे तूर्तास तरी अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 858 पर्यंत पोहचली आहे. आज 70 नव्या कोरोना रुग्णांची बर पडली आहे. यापैकी आतापर्यंत उपचारानंतर 1480 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच 1327 रुग्ण कोरोना सक्रीय असून ते उपचार घेत आहेत. अहमदनगरमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.