आधीच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाने सुमारे 10 हजार कर्माचाऱ्यांना नारळ दिल्याचे वृत्त सोमर आले होते. महामंडळानं यासंदर्भात एक पत्रक काढून कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्यात आल्याची माहिती दिली होती त्यामुळे कर्मचाऱ्यांना धक्का बसला होता.
मात्र यवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. एसटी महामंडळानं कुठंही कर्माचारी कपात केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जे चार हजार कर्मचारी भरती करणार होतो, ती भरती थांबण्यात आली आहे. ही भरती टप्याटप्यात करणार असल्याचं अनिल परब यांनी यावेळी सांगितले आहे.
कोरोनाच्या संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाचा डोलारा कोलमडला आहे. एक लाख कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे पगार थकले आहेत. एसटी आधीच पाच हजार कोटी रुपयांनी तोट्यात धावत होती. त्यात आता कोरोनामुळे दोन हजार दोनशे कोटींची भर पडली आहे. सरकारकडे 480 कोटी मागितले आहेत. पैसे मिळाल्यास या पुढील पगार होतील, असं देखील अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या 100 दिवसांपासून एसटी सेवा ठप्प आहे. दिवसाला 22 कोटी रुपयांचं उत्पन्न बुडात असल्याचेही परब म्हणाले.