मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून एकप्रकारे त्यांच्यामागे निसर्ग हात धुवून लागला आहे. राज्यावर आस्मानी संकटांची मालिकाच सुरु असून, गारपीट, चक्रीवादळं, पूर आणि आता महामारीने राज्य सरकारचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे. या आपत्तीत हजारो कोटींचा नुकसान झालं.
परळीत पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त मुंडे समर्थकांची बॅनरबाजी, मात्र भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब
राज्यात आत्तापर्यंत १५० पेक्षा जास्त नागरिकांचा यावर्षीच्या महापुरात मृत्यू झाला असून, यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अधिक आहे. जवळपास नव्वद हजार लोकांचं आत्तापार्यंत स्थलांतर करण्यात आल्याची माहिती शासनाकडून मिळत आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा २७ जुलैला ६० वा वाढदिवस आहे.
आढावा बैठकीनंतर पूरग्रस्त भागासाठी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय
दरम्यान, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. “अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल आहे. त्यामुळे कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये,” असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
एकदा शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या, पुन्हा कधीच भीक मागणार नाही! जगण्यासाठी त्यांनी जोडले हात
याबाबत अधिक सांगताना त्यांनी, “वाढदिवसानिमित्त कुणीही अभिष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटायला येऊ नये. बॅनरबाजी करू नये, पोस्टर्स लावू नये. मला शुभेच्छा सोशल मीडिया व ईमेलच्या माध्यमातून द्याव्यात, मी त्या शुभेच्छा स्वीकारतो. राज्यात अजूनही महामारीचे संकट कायम आहे, संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यतादेखील टास्क फोर्सने व्यक्त केली आहे. त्यामुळे नियम पाळावेत आणि वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत,” असं आवाहन त्यांनी केलं आहे.
“आमचे आई-वडील तुम्ही आहात, आम्हला काहीही करून जगवा…” चिपळूणकरांनी मुख्यमंत्र्यांसमोर फोडला टाहो!
तसेच, “भीषण पूरपरिस्थिती आणि महामारी या परिस्थितीत एकमेकांना मदत करणे, एकमेकांसाठी उभे राहणे गरजेचे आहे. त्यामुळे, वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन, आपण आपली सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पाडावे,” असं देखील त्यांनी सांगितलं आहे.
‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, निवेदन पाहून अजितदादा भडकले
आज मुख्यमंत्री चिपळूण दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी, चिपळूण मधील बाजारपेठ, चिंचखरी नाका आणि अभिरुची हॉटेल येथे येऊन व्यापारी, स्थानिक नागरिक आणि छोटे छोटे व्यवसायिकांची भेट घेतली, त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. यानंतर त्यांनी, रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि आपतकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून, पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत देण्याचं जाहीर केलं आहे.
Read Also :
- चांगल्या-वाईट कामचं प्रशस्तीपत्रं राहू द्या, राजकारण आणि टीका सोडून सध्या पुनर्वसन महत्त्वाचं
- पुन्हा एक हात मदतीचा: कोकणवासीयांसाठी आमदार महेश लांडगेंचे आवाहन
- तळीये दरड दुर्घटना : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्थानिक सांगतील तिथे पक्की घरे बांधून देणार- नारायण राणे
- पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मत्र्यांची मोठी घोषणा, जेईई मेनच्या तिसऱ्या सत्राच्या परीक्षेची पुन्हा संधी मिळणार
- नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, आज चिपळूण दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी