मुंबई : राज्यात आणि देशात मागील काही दिवसांपासून लव्ह जिहाद अन् इतर मुद्यांवरून हिंदू जन आक्रोश मोर्चा निघत आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या शहारांत हिंदुत्वादी संघटनांनी हे मोर्चे काढले आहेत. यातच काल मुंबईत जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चोच भाजपचे अनेक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यावर आता काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी आपली प्रतिक्रिया देतांना भाजपवर निशाणा साधला आहे.
“..तर त्यावेळी महेश लांडगे हे शिवसेनेचे आमदार झाले असते”, शिंदेंनी सांगितली जुनी आठवण
हिंदुत्वादी सत्तेवर आहेत. आणि हिंदुत्वादी संघटनांना जन आक्रोश मोर्चा काढावा लागतो. काॅंग्रेस सत्तेवर असताना असा आक्रोश करावा लागला नाही, ना मोर्चा काढावा लागला. भाजपची दांभिकता ती हीच हिंदू नव्हे भाजपची सत्ता संकटात असते. असं म्हणत सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“हिंदु आक्रोश मोर्चा हा मोदी आणि शहांच्या विरोधात,” संजय राऊतांची भाजपवर प्रखरशब्दात टिका
संजय राऊत म्हणाले की, कालचा जो मोर्चा काढण्यात आला होता, तो कुणी आणि कुणाविरोधात काढला होता, ते अजून स्पष्ट झालं नाही. मला तर असं वाटतं की महाराष्ट्रातील भाजपच्या युनिटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरूद्ध मोर्चा काढला की काय ? असं क्षणभर वाटलं. महाराष्ट्रामध्ये जर हिंदु जनआक्रोश मोर्चा निघाला असता तर हे आव्हान मोदी आणि शहांना आहे. कारण नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ तसेच देवेंद्र फडणवीस हे सर्व नेते स्वत:ला कडवट हिंदुत्वावादी म्हणून घेणारे नेते आहेत. त्यांचं दिल्लीत आणि महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे. केंद्रात तर आठ वर्षापासून हिंदुत्वाचं सरकार आहे. अत्यंत प्रबळ आणि शक्तिमान दोन्ही नेते आहेत. तरीही धर्मांतर होत असतील तर लव्ह जिहाद सारखे विषय घडत असतील हे या सरकारचं अपयश आहे.
कसबा पोटनिवडणुकीत आघाडीत रस्सीखेच आणखीच वाढली, शिवसेना, काॅंग्रेसमध्येच जुंपली
त्यामुळे न्याय मागण्यासाठी शिवसेना प्रमुखाच्या शिवसेना भवनाच्या पुतळ्यासमोर अत्यंत व्यथीत मनाने जमलेले दिसताहेत.खरं म्हणजे हिंदुचा आक्रोश काय आहे. हे बघायचं असेल तर काश्मीरला जावं. हिंदु पंडितांचा आक्रोश पाहायला हवा. आजही हजारो काश्मीरी पंडित जम्मूच्या रस्त्यावर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करताहेत. ते आपल्या घरी जाऊ शकले नाहीत. हा हिंदु आक्रोश मोर्चा काढला आहे. त्यांनी जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान राज्यपालांनी केला होता. तेव्हा या मोर्चा करणाऱ्यांच्या तोंडाला बुच का बसला होता. ? शिवाजी महाराजांचा अपमान चालतो. त्याठिकाणी त्यांचा हिंदु आक्रोश नाही यांचा. काश्मिरच्याबाबतीत, रामभक्तांवर गोळ्या चालवणाऱ्या, तसेच वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान नाही, त्यांच्याविरोधात का आक्रोश मोर्चा काढत नाहीत. असंही त्यांनी सांगितले.
हिंदूत्ववादी सत्तेवर आहेत आणि हिंदूत्ववादी संघटनांना जन आक्रोश मोर्चा काढावा लागतो…
काँग्रेस सत्तेवर असताना असा आक्रोश करावा लागला नाही ना मोर्चा काढावा लागला…
भाजपाची दांभिकता ती हीच…
हिंदू नव्हे भाजपा ची सत्ता संकटात असते.— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 30, 2023
Read also
- सत्यजीत तांबेंना भाजपची खुली ऑफर..! सत्यजीत तांबेंचं त्यावर प्रत्युत्तर काय?
- शिवसेना, धनुष्यबाणा संदर्भात ठाकरे अन् शिंदे गटाचं लेखी उत्तर…! निवडणुक आयोगाकडे दाखल
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता ‘रामराज्य’ : शिंदे-फडणवीस सरकारची आमदार लांडगेंना ताकद!
- “माझाच विजय झाला आहे, आता फक्त निकालाची वाट”, मतमोजणीआधी सत्यजीत तांबेंचा विश्वास
- पुण्यात आपचं संघटन वाढतयं…! काळजेवाडी चऱ्होली बुद्रुक येथे आप च्या शाखेचे उदघाटन