कोल्हापूर : मराठा आरक्षणाप्रश्नी आज संभाजीराजेंच्या नेतृत्वात पहिल्यांदाच आंदोलन होत असून, त्यांनी मराठा समाजाला मूक मोर्चाची साद दिली आहे. त्यानुसार आज, शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून, शाहू महाराजांच्या आशीर्वादाने या मूक मोर्चाला सुरुवात झाली असून, यावेळी मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला. काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यांसारख्या नेत्यांनी, तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व आमदार-खासदार यावेळी आंदोलनस्थळी पाठिंबा दर्शवण्यासाठी उपस्थित होते.
हे पण वाचा, धैर्यशील मानेंनी उंचावले आंदोलनकर्त्यांचे मनो”धैर्य”, हाताला सलाईन लावून लावली आंदोलनस्थळी हजेरी
यावेळी, ‘सर्वात पहिल्यांदा मराठा आरक्षण पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली आलेल्या आघाडी सरकारने दिलं. त्यावेळी नारायण राणे समिती नेमून मराठा आरक्षण देण्यात आलं. पण तीच आमच्याकडून मोठी चूक झाली, तत्कालीन भाजप सरकारकडूनही तीच चूक झाली. कुठलाही आयोग न नेमता समिती नेमून आरक्षण दिलं. या चुकीमुळेच सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण नाकारलं,’ अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
हे पण वाचा, “आता दिल्लीलाही जाग येईल, मराठा आरक्षणावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी”- छत्रपती शाहू महाराज
तसेच यावेळी त्यांनी भाजपला राजकारण न करण्याची विनंती केली असून, ‘भाजपला हात जोडून विनंती, या मुद्द्यावर राजकारण करु नका, तुम्ही आघाडी सरकारमुळे मराठा आरक्षण टिकलं नाही म्हणता, पण तुमच्या सरकारने कायदा नीट केला असता, तर तो टिकला असता, त्यामुळे आता एकमेकांच्या चुका न काढता, मराठा समाजाच्या हितासाठी त्यांच्या या मागण्या कशाप्रकारे पूर्ण करता येतील, याकडे लक्ष केंद्रीत करु,’ असं आवाहन त्यांनी भाजपला केलं आहे.
हे पण वाचा, संभाजीराजे यांच्या मागण्याबद्दल सरकार 100 टक्के सकारात्मक -सतेज पाटील
दरम्यान, आघाडी सरकार मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी १००% सकारात्मक आहे. मराठा समाजाचे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय शासनाला स्वस्थ बसू देणार नाही, याची ग्वाही मी तुम्हाला देतो. फक्त या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला थोडा वेळ द्या. मी आरक्षणाच्या मुद्द्यावर कालच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी, आम्ही चर्चेसाठी कधीही तयार असल्याचं म्हटलं आहे. आत्तापर्यंत मराठा समाजाने संयम दाखवला आहे. अजून थोडा संयम दाखवा. आम्ही मागण्या पूर्ण केल्याशिवाय सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, मग त्यासाठी वाटेल ती किंमत का मोजावी लागेना! असं सांगून त्यांनी मराठा समाज आणि आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिलं आहे.
Read Also :
- शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने भिडले; सेना भवनासमोर तुफान राडा
- …येत्या तीन वर्षातच नाना पटोले, अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी
- शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हरवले आहेत; आपण त्यांना पाहिलतं का?
- ‘मराठा समाजाला सगळ्या सवलती देण्याची मागणी ‘अधिवेशनाच्या’ पहिल्याच दिवशी करणार’
- भाजप-काँग्रेसमध्ये वाद; बोलू दिले जात नसल्याच्या आरोपावरुन आमदारांमध्ये वादावादी