मुंबई : कोरोनाच्या सलग दोन लाटांमुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला असून, विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी, मागील जवळपास दीड वर्षांपासून कॉलेज आणि शाळा पूर्ण बंद आहेत. सर्व काही शकयतो ऑन लाईन पद्धतीने सुरु आहे. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. मात्र आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कॉलेज आणि शाळा सुरु करण्याबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
आज बारावीनंतरच्या प्रवेशाबाबत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, “राज्यातला कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता, येणारं शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजमध्ये बोलवण्यात येणार आहे.
तसेच, याबाबतचा निर्णय येत्या ८ दिवसात घेतला जाईल. प्रत्येक जिल्ह्यात वेगळी परिस्थिती आहे, त्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी कॉलेज सुरू होताना वेगळे नियम लागू केले जातील”, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, “यावेळी कोरोना असल्याने CET प्रवेश परीक्षा घेण्यात येणार नाही. त्याऐवजी विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांवरच कॉमर्स, सायन्स आणि आर्ट्समध्ये प्रवेश दिला जाईल. यासंबंधीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार असून, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून, कॉलेजमध्ये तुकड्यादेखील वाढवण्यात येणार आहेत”, असे त्यांनी सांगितले.
Read Also :
- ‘ज्यांनी भाजपला सोडले त्यांची वाईट परिस्थीती झाली’, शेलारांचा एकनाथ खडसे यांना टोला
- मनसे-भाजपच्या राजकारणाला मिळणार दिशा? चंद्रकांत पाटील घेणार लवकरच ‘राज’भेट
- झिकाचे संक्रमण नाही, घाबरून जाऊन नका! आरोग्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन
- “आरक्षण गेलं हे पाप भाजपचं”, ओबीसी आरक्षणावरून बावनकुळे-वडेट्टीवार आमनेसामने
- “MPSC सदस्य नियुक्तीची फाईल मंजूर करा”, मागणी घेऊन ठाकरे सरकारचा मंत्री राज्यपाल दरबारी