मुंबई : भगतसिंह कोश्यारी : अ सोल डेडिकेटेड टू द नेशन या डॉ तुषार कांती बॅनर्जी लिखित पुस्तकाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवन येथे प्रकाशन कऱण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यापालांचं मोठं कौतुक केलं आहे. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील फडणवीसांचं कौतुक केलं. त्यावरून काॅंग्रेसने त्यांना खोचक टोला हाणला आहे.
“आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल, आदर देतोय, आदर घ्या…;” मनसेचा शरद पवारांवर निशाणा
कोरोना काळात गेल्या दोन वर्षात तत्कालीन मुख्यमंत्री-मंत्री राज्यातील ज्या भागात गेले नाहीत. तेथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गेले. त्यांनी तीन वर्षाच्या कार्यकाळात तब्बल 1077 जाहीर कार्यक्रम व समारंभात हजेरी लावली आणि राज्यातील विद्यापीठांच्या 48 दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते असं फडणवीस यांनी सांगितलं.
“तेव्हा दोन तास मला गुंतवणुकदारांसाठी काढायला लागायचे पण आता…”; शरद पवार
त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचा आशेचा किरण आहेत. देवांची इच्छा झाली तर ते देशासाठी खुप मोठं काम करतील असं राज्यपालांनी सांगितलं आहे. त्यावर राज्यपालपदी असताना व्यक्तीने तटस्थ वागणे अपेक्षित असते पण सध्याच्या राज्यपाल महोदयांची पदावर आल्यापासूनची एकंदरीत वागणुक पाहता ते राज्यपाल कमी आणि भाजपचे प्रचारक असल्यासारखे जास्त वागतायत असं काॅंग्रेसने म्हटलं आहे.
“ठाकरेंना गिधाड अन् गरूडामधलं फरक माहित नाही, अमित शहा हे गरूड आहेत”; भाजपचं प्रत्युत्तर
दरम्यान, एकाने देश विकला एक महाराष्ट्र विकतोय, असा खोचक टोला देखील काॅंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीसांवर लगावला. देवेंद्र फडणवीस आशेचा किरण नाही तर महाराष्ट्रातील कंपन्या गुजरातला पळवणारा एजंट आहे असंही काॅंग्रेसने म्हटलं आहे. त्यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार त्या पाहणं महत्वाचं ठरणार आहेत.
राज्यपाल पदी असताना व्यक्तीने तटस्थ वागणे अपेक्षित असते पण सध्याच्या राज्यपाल महोदयांची पदावर आल्यापासूनची एकंदरीत वागणूक पाहता ते राज्यपाल कमी आणि भाजपचे प्रचारक असल्यासारखे जास्त वागतायत! pic.twitter.com/U3rTsdEbjL
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 22, 2022
Read also
- “माझे काम भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी संपवण्याचे आहे”; राहुल गांधी
- उद्धव ठाकरेंंची दिवसेंदिवस ताकद वाढतेय; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी सेनेत केला प्रवेश
- “माझे कुटुंब, माझी जबाबदारी, आम्ही फक्त चार राहू बाकी कोणीच नाही”; चंद्रशेखर बावनकुळे
- “उद्धव ठाकरेंनी कालचं भाषण दारू पिऊन केलंय”; अन् नारायण राणेंची जीभ घसरली
- “हिमंत असेल तर शिंदे गटातील आमदारांना भाजपानं पक्षात विलीन करावं”; भास्करराव जाधव