मुंबई : महामारीचे नियम न जुमानता राज्यभरात मोठ्या गर्दीत राजकीय यात्रा आणि सभांना परवानगी आहे, हॉटेल्स, मॉल सुरु झाली मात्र, राज्यातली मंदिरे दीर्घकाळापासून बंद आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यात यावीत यासाठी भाजप-मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून, दोन्ही पक्षांकडून विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकार मंदिरे उघडण्याचा निर्णय घेणार का? या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नियम पाळा, पुन्हा सगळं बंद करण्यास भाग पाडू नका – अजितदादांनी खडसावलं
आज, पुण्यात आढावा बैठक पार पडल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, मंदिरे खुली करण्यासाठी भाजप-मनसेच्या आंदोलनाबाबत त्यांना विचारले असता त्यांनी, “भाजप म्हणत आहे मंदिरे उघडा, मात्र त्यांनी केंद्र सरकारच्या काय गाईडलाईन्स आहेत, त्या वाचाव्यात. सणासुदीच्या मोसमात गर्दी करू नका, असं केंद्र सरकारने स्पष्ट म्हटलं आहे. त्यामुळे, महामारीचा प्रादुर्भाव कमी झाला, की राज्य सरकार मंदिरे उघडण्याबाबतचा निर्णय विचार करून घेईल,” असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे एक पाऊल पारदर्शक कारभाराकडे; ‘सीसीटीव्ही’तून तपासणार स्वत: च्या नगरसेवकांचा खोटारडेपणा
“आक्रमक कोणत्या प्रश्नावर व्हायचे, कोणत्या नाही; हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करणार. त्याच अनुषंगाने हा मुद्दा आहे. या भावनिक मुद्द्याच्या निमित्ताने काहीतरी साध्य करता येऊ शकतं का?, हे आजमवण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत,” असं म्हणत त्यांनी नाव न घेता भाजपवर निशाणा साधला.
भाजपचा झोलझाल, चंद्रकांत पाटलांनी लिलाव करून पदे वाटली – राष्ट्रवादी
दरम्यान, “मंदिरात जाण्यासाठी भाविकांना का रोखले जाते? फक्त मंदिरे उघडल्यानेच कोरोना वाढतो का? असे प्रश्न करत, गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांचा विरोध झुगारून थेट मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला असून, नाशिक, नागपूर, पंढरपूर, पुणे आणि औरंगाबाद, शिर्डी परिसरातल्या स्थानिक भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मंदिर परिसरात घंटानाद आणि शंखनाद आंदोलन करत, मंदिरे उघडण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे.
Read Also :
- “नमस्कार ताई, तुम्हाला शब्द देतो…”, मुख्यमंत्र्यांनी दिले कल्पिता पिंपळेना आश्वासन
- मोठी बातमी : बैलगाडा शर्यतींचा ‘धुरळा’ उडणार, न्यायालयाकडून अखेर परवानगी
- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल, काय आहे प्रकरण?
- संभाजीराजेंसह शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट, नेमकी काय चर्चा झाली? वाचा सविस्तर
- फास आणखी आवळला, देशमुखांचे वकिल आणि तिवारी यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी