पुणे : फेब्रुवारी 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या महापालिकांच्या प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने आदेश जारी केले आहेत. त्यामुळे राज्यातील बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.
सोलापुरात वंचितला धक्का बसणार? मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर!
या पार्श्वभूमीवर आता राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण, भाजप नेते व खासदार गिरीश बापट यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना, “आम्हाला चार सदस्यीय प्रभाग पद्धती हवी आहे. त्यामुळे एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला आमचा विरोध आहे. हा सगळा राज्य सरकारचा निर्णय आहे, कॅबिनेट काय निर्णय घेते ते बघू,” असं बापट म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातल्या १८ महापालिकांत एक प्रभाग एक सदस्य पद्धतीने निवडणूक होईल असं स्पष्ट केलं आहे.
राणेंच्या अटकेसाठी दबाव टाकल्याचं सिद्ध झाल्यास राजकारणातून सन्यास घेईन – उदय सामंत
तसेच, २०११ च्या जनगणनेनुसारच प्रभाग रचना केली जाणार असून, प्रभागाची सीमा ठरवताना काही सूचना करण्यात आल्या आहेत. यात मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, उड्डाणपूल या नैसर्गिक मर्यादा लक्षात घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. प्रभाग रचना करताना रस्ते, नद्या, नाले, सिटी सर्व्हे यांच्या नंबरला उल्लेख करणं गरजेचं आहे. त्यानंतर, हरकती-सूचना, आरक्षण सोडत ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
Read Also :
- “राजकीय पक्षात मतभेद असतात पण…”, भाजप खासदार गिरीश बापट यांचा राणेंना घरचा आहेर
- केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल
- कोरोना संकटात महाराष्ट्राला सावरण्याचं श्रेय माझ्या एकट्याचं नाही – उद्धव ठाकरे
- “आम्ही आणि मोदी पाहून घेऊ, एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही,”
- “एखाद्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानखाली मारेन असं म्हटलं तर..” – राऊत कडाडले