मुंबई : गेल्या ३ दिवसांपासून तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्रासह गुजरात आणि गोव्याला जोरदार तडाखा दिला. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोघेही कोकण दौऱ्यावर आहेत.
दरम्यान, यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी, ‘महाविकास’ सोडाच, हे सरकार तर “आत्मघातकी” सरकार आहे’. महामारीचं व्यवस्थापन आणि नियोजन करण्यात हे सरकार नापास ठरलं आहे, असे सांगत त्यांनी, हे सरकार बाधित रुग्णांची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप केला आहे.
तसेच, विविध भागांतल्या नुकसानीची पाहणी झाल्यानंतर, “कोकण भागाला गेल्या २ वर्षांपासून वादळाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसतो आहे. यामुळे कोकण किनारपट्टीलगतच्या आणि आजूबाजूच्या प्रदेशाचं अतोनात नुकसान झालं आहे. गेल्या वर्षीदेखील निसर्ग वादळावेळी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत लोकांपर्यंत अजून पोहोचलेली नाही. त्यामुळे यावेळी तरी त्यांना सर्व मदत मिळावी, अशी मागणी करत त्यांनी, “काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं हे या सरकारचं नित्याचं झालं आहे”, असा ठाकरे सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.
यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना, “ठाकरे सरकार वेळखाऊपणा करत आहे. आम्ही तर काहीच करणार नाही, पण मोदींना मात्र सांगत राहू, अशी कृती म्हणजे मराठा समाजाची केलेली फसवणूक आहे”, असा आरोप त्यांनी आघाडी सरकारवर केला आहे. तसचे, ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, अशी भाजपची स्पष्ट भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Read Also :
- योग्य वेळी ठाकरे सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू; देवेंद्र फडणवीसांचा पुनर्उच्चार
- ‘खत दर वाढीवरून जशी टीका केलीत, आता तसंच मोदी सरकारचं कौतुकही करा!’
- ‘राज्यभर फिरण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी ई – पास काढलाय का?’ RTI अंतर्गत याचिका दाखल
- शिवसेना खासदार म्हणाला, ‘ नरेंद्र मोदी दिलदार पंतप्रधान’
- ‘ईडी येऊ देत आणि जाऊ देत, आमच्यासाठी ईडी म्हणजे…’