हे सरकार पाडण्यात आम्हाला कुठलाही रस नाही. तुम्हीच किमान हे सरकार चालवून दाखवा,’ असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारला दिले आहे. तसेच महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार जनतेने निवडून दिलेलं नाही, तर धोक्याने आलेले सरकार आहे, असा आरोपहि त्यांनी यावेळी केला.
. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ठाकरे सरकार धोक्याने आलेलं सरकार आहे. तुम्ही एकमेकांच्या तंगड्या ओढायला सक्षम आहात. पण तुम्ही किमान सरकार चालवून दाखवावं. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली आहे. तुमची जर दिशा चुकत असेल तर ते समोर आणणं आमचं काम आहे,’ असे फडणवीस म्हणाले.
रदेश भाजप कार्यकारिणीची बैठक सोमवारी दादर येथील वसंत स्मृती येथे व्हर्च्युअल पद्धतीने झाली. या बैठकीचा समारोप फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने झाला. या बैठकीला फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश तसेच राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते