जनतेच्या दैनंदिन उदरनिर्वाहचा विचार करून कोरोना बाबत योग्य ते विचार करून संचार बंदी उठवणे व प्रतिबंधित क्षेत्रात बी बियाने, खतांची दुकाने चालू ठेवने या व जनतेच्या अनेक समस्या बाबत निवेदन व्दारे सोडवण्याची मागणी पालकमंत्री नवाब मलिक यांना सेलू मनसे च्यावतीने करण्यात आली.
परभणी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी वारंवार संचारबंदी आदेश काढत आहात त्या मुळे शेतकरी, मजूर, व्यापारी, कामगार,भिकेला लागत आहेत. त्यांना व्यवसाय शिक्षण शेती दवाखाना यासाठी कर्ज काढावे लागत आहे.या कोरोनाच्या संकटामुळे बैंकाही कर्ज देत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यानी, शेतकऱ्यांनी अगोदर घेतलेल्या कर्जाची परत फेड करण्यासाठी व घरखर्च चालवण्यासाठी या बंद मुळे कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे व्यापार्यांचे, शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे. त्या मुळे आत्महत्या सारखे विचार येत आहे.
परभणी जिल्ह्याला या आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी योग्यती पर्याय व्यवस्था करण्यात यावी तसेच जिल्हा यापुढे बंद करूनये व अन्यथा शासनाने व प्रशासनाने या गोष्टींची गंभीर दखल न घेतल्यास ना विलाजास्तव महाराष्ट्र नव निर्माण सेनेला शासनाच्या व प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल व या आंदोलनाची सर्वस्व जवाबदारी शासनावर राहीन याची नोंद घ्यावी असे निवेदन नवाब मलिक यांना देण्यात आले आहे.