मुंबई : आगामी महापालिकेच्या निवडणुकांमध्ये 40 पैकी 20 महानगरपालिकांवर बाळासाहेबांची शिवसेनेची सत्ता असणार आहे. तसेच मुंबई महापालिकेवर आमचाच झेंडा फडकणार असून तिथेच आमचाच महापौर बसणार आहे. त्याचबरोबर 2024 ला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीचं राहणार आहे. तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हेच आमचे मुख्यमंत्री म्हणून राहतील. असं भाकित शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर यांनी केले आहे. मालाड येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
“एमआयएमशी युती झाल्यास आघाडीतून शिवसेना बाहेर पडणार का?” भाजप नेत्याचा सवाल
बाळासाहेबांसोबत जवळपास 45 वर्ष काम केलं, त्यांनी मला अनेक महत्वाची पदंही दिलीत. उद्धव ठाकरे यांच्या काळात मला तीनदा उमेदवारी मिळाली. कारण माझी उमेदवारी कापण्याची हिमंत त्यांची आणि त्यांच्या जवळच्या माणससांची नव्हती. पण बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला त्यांनी बाजूला सारलं. एका नवीन व्यक्तीला केंद्रात मंत्रिपद दिलं. तरीही मी शिवसेना सोडली नाही. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उठाव केला. तेव्हा मी त्यांच्यासोबत जायचं ठरवलं अन् बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला, असंही गजाजन किर्तीकर यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडाळी केल्यानंतर भाजपने शिंदेंच्या हातीची राज्याची सुत्रे दिलीत. त्यांच्याकडे 40 तर भाजपकडे 105 आमदारांचं संख्यबळ असूनही भाजपने मुख्यमंत्री पद शिंदे गटाला दिले. त्याचं कारणंही तसंच होतं. अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद घेऊन काय करायचं. पुढे पाच वर्ष आमचीच सत्ता असून मुख्यमंत्रीही आमचाच राहणार अशी वल्गना भाजपच्या नेत्यांकडून मांडली जात आहेत. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पद शिंदे गटाला सोडलं.
दरम्यान, आपल्या 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंचा हात धरला. शिंदे सोबत आपण का गेलो. याचं कारणही यावेळी गजानन किर्तीकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, खोक्यांसाठी 40 आमदारांनी बंड केलं नाही. उद्धव ठाकरे आणि कॅंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन आपली विचारधारा बदलली. त्यामुळे आमदारांनी शिवसेनेला वाचवण्याचं काम केलं. सर्वात आधी शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे मीही बाहेर पडलो असल्यांच गजानन किर्तीकर यांनी निक्ष्शून सांगितले.
Read also
- ऊर्फी जावेदवर आता टिका नको, तिचं कौतुक करा, चित्रा वाघ यांनी केलं ऊर्फीचं कौतुक
- कसबा पेठ पोटनिवडणुक मनसेने लढवावीच,; मनसेच्या कार्यकर्त्यांची राज ठाकरेंकडे मागणी
- सत्यजीत तांबेंचा भाजप कनेक्शन, थेट भाजपच्या कार्यालयात जाऊन घेतली जिल्हाध्यक्षांची भेट
- “पोटनिवडणुकांमध्ये मतं कमी पडली तर तिकीट कापलं म्हणून समजा”, भाजपच्या माजी खासदाराचा नगरसेवकांना इशारा
- “तर त्यांनी हा खटला लवकर दाखल करावा,” इम्तियाज जलील यांचे सुभाष देसाईंवर धक्कादायक आरोप