पंढरपूर, दि. ३ : – राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर येथे घेण्यात आलेल्या पोटनिवडणूक भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय झाला. त्यामुळे आमदार प्रशांत परिचारक यांनी आवताडेच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली. दंड काय थोपटता, बदला घ्यांयचा असेल तर २०२४ला रिंगणात उतरा अन् तुमची थोपटा दंड, असे म्हणत राष्ट्रवादीचे पराभव झालेले उमेदवार भगीरथ भालके यांनी आमदार परिचारक यांना आव्हान दिले आहे. पंढरपूरातील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भालके म्हणाले, माझ्या वडिलांचे आजाराने दुर्दैवी निधन झाले. पंढरपूर-मंगळवेडा हे मतदारसंघ संताची पवित्र देवभूमी आणि दत्तभूमी आहे. माझे वडील हयात नसताना देखिल माझ्या वडिलीवर, माझ्यावर आणि माझ्या कुटूंबीयांवार आमदार परिचारक यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी गल्लीच्छ टीका केली. ही दुर्दैवी बाब आहे, असे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
निवडणूक निर्णयानंतर पंढरपूरच्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात विजयाचा जल्लोष करत असताना भाजपचे काही नेते विजयी उमेदवारांचे दंड थोपटत बदला घेतल्याचा दावा करत होते. खऱ्या अर्थाने दंड थोपटत असताना संतांच्या पावनभूमीत आपन एका स्वर्गीय व्यक्तीचा अवमान करत आहेत. हे त्यांच्या लक्षात यायला हवे होते. मात्र, अशा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता भाजपच्या नेत्यांनी जल्लोष केला. पंढरपूरातील जनतेने मला चांगली साथ दिली. त्यांचा मी आभारी आहे. जनता आणि त्यांचे आर्शिवाद आजही माझ्या सोबत आहेत. तुम्हाला जर दंड थोपटायचे असतील तर, २०२४ च्या निवडणूकीत उतरा, मग पाहू कोण-कोणाचे दंड थोपटते, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.