औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर रावसाहेब दानवे पहिल्यांदाच औरंगाबादमध्ये आले आहेत. यावेळी करोना साथीच्या नियमांचं उल्लंघन करून कार्यकर्त्यांकडून त्यांचं, जल्लोषात रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत करण्यात आलं! हा सत्कार समारंभ उरकल्यानंतर त्यांनीही काही वेळ प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केलं.
शिवसेनेला महाराष्ट्रातून संपविल्याशिवाय राहणार नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारांनंतर खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यांनतर मुंडे समर्थकांची नाराजी प्रकर्षाने बाहेर आली. पंकजा मुंडे यांनी, दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आणि नंतर नाराज समर्थकांना शांत केले. मात्र त्यांची नाराजी लपली नाही. नुकत्याच राज्य भाजप नेत्यांची दिल्ली वारी झाली. त्यावेळीही या नेत्यांतील नाराजी माध्यमांतून दाखवली गेली. त्यावर आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पडदा पाडला आहे.
फरार गजानन काळेंना लवकरात लवकर अटक व्हावी, संजीवनी काळे यांचे केंद्रीय मंत्र्याना साकडे
“पंकजा मुंडे मला भेटल्या. जेपी नड्डा आणि अमित शहा यांना भेटल्या. त्यांच्या वागण्या बोलण्यातून आणि व्यवहारातून त्या नाराज आहेत असं काही वाटलं नाही. एखादा राजकीय नेता राज्याच्या मंत्र्यांना भेटतो. त्यामुळे त्यातून राजकीय अर्थ काढणं काही योग्य नाही,” असं रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेवरही मत व्यक्त करताना त्यांनी, “हे शक्तिप्रदर्शन नाही. राजकीय कार्यकर्ता फिरला पाहिजे, प्रश्नांची जाण होते. त्यासाठी या यात्रा सुरू आहेत,” असं सांगितलं.
या सरकारने राज्यातील जातीय स्थिती बिघडवली, आघाडी सरकारकडून जनतेची फसवणूक सुरु
ते म्हणाले, “मी रेल्वे मंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदा मराठवाड्यात आलो. कार्यकर्त्यांना अत्यानंद झाला. त्यांनी माझा सत्कार केला. मी त्यांच्या बळावर या पदापर्यंत येऊन पोहोचलो आहे. मी मराठवाड्यातल्या रेल्वेचे अनेक महत्वाचे प्रश्न सोडवणार आहे. नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन मार्ग तयार झाला, तर मुंबई-औरंगाबाद दीड तासात आणि नागपूरला ३ तासात पोहोचणे शक्य होईल. आता रेल्वेचे अधिकारी सादरीकरण तयार करत आहेत. मी गेल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल.”
Read Also :
- सचिन वाझे यांच्यासोबत अनिल देशमुखांना एकाच कोठडीत राहावं लागेल – किरीट सोमय्या
- बैलगाडा शर्यत चालू करा; पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
- …तोपर्यंत गळ्यात हार आणि डोक्याला फेटा बांधणार नाही; पंकजा मुंडेची आक्रमक भूमिका
- राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे; संदीप देशपांडेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
- पुणे शहराला खड्ड्यात घालवून भाजपची खोटी बॅनरबाजी; राष्ट्रवादी स्पर्धेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांची पोलखोल करणार