मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाराज असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली होती. दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी या चर्चांवर मौन सोडलं असून आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी, केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या देशातील आणि राज्यातील नेत्यांचं अभिनंदन करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
पक्षात मी-मी चालत नाही, आधी राष्ट्र, पक्ष आणि शेवटी मी; ही भाजपची संस्कृती, पंकजाताईंचा रोख कुणाकडे?
यावेळी, पंकजा मुंडे आपल्या वडिलांच्या, गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने भारावून गेल्या असल्याचे दिसून आले. पत्रकारांच्या अनेक आडवळणांच्या प्रश्नांना, त्यांनी अगदी चपखल आणि सडेतोड उत्तर दिले. “मुंडे साहेब जेव्हा निवडून आले, तेव्हा मी एकटीच होते, आमचा एकही आमदार नव्हता, माझ्या पायाला फोड आले होते, मी पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार केला”, असं सांगत असताना, त्या भावूक झाल्याचंही दिसून आलं.
आम्ही नाराज नाहीत, आमच्यावर मुंडे साहेबांचे संस्कार; पंकजा मुंडेंनी मौन सोडले
“प्रीतमताई निवडणुकीला, बापाच्या मृत्यूनंतर उभ्या राहिल्या. त्यामुळे, त्यानं सहानुभूती मिळणार होती. त्या रेकॉर्डब्रेक करणार होत्या. पण, आता जी निवडणूक त्या जिंकल्या आहेत, त्या त्यांच्या मेरीटवर जिंकल्या आहेत. मनाला काय लागत नाही! मुंडे साहेबांचा शपथविधी देखील झाला नव्हता, ते निवडून आले आणि ३ जूनला त्यांचा अपघात झाला. शपथ घेण्यापूर्वीच ते गेले. त्यानंतर १७ दिवसांतच प्रीतमताई राजकारणात आल्या, त्यांनी लोकांना शांत केले”, असं म्हणत, “मी आणि प्रीतमताई नाराज नाही. आमच्याबद्दल चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या आहेत, हे त्यांनी स्पष्ट केलं.
Read Also :
- लातूरमध्ये राष्ट्रवादीने, भाजप-काँग्रेसला दाखवली वेळ; लावले अनेक पदाधिरकारी गळाला
- पुण्यात एकाच तिकिटावर मेट्रो आणि बसने प्रवास करता येणार – देवेंद्र फडणवीस
- प्रकाश आंबेडकर ICU मध्ये, मात्र बायपास सर्जरी यशस्वी, रेखा ठाकूर यांची माहिती
- “मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वांना फडणवीसांनी संपवलं”, शिवसेनेची टीका
- काँग्रेसमध्ये राऊत-पटोले वाद उफाळला, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत थेट दिल्ली दरबारी दाखल