मुंबई : केंद्रीय मंत्री मंडळाच्या विस्तारांनंतर राज्यात भाजप मध्ये मोठं नाराजी आणि राजीनामा नाट्य पाहायला मिळालं. खासदार प्रीतम मुंडेंची केंद्राच्या मंत्री मंडळात वर्णी न लागल्याने, नाराज मुंडे समर्थकांनी राजीनामास्त्र बाहेर काढले आणि तब्ब्ल १०० च्या वर भाजप पदाधिरकऱ्यांनी आपला राजीनामा दिला.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी अचानक दिल्लीवारी केल्याने या सर्व घटना प्रसंगाला नाट्यमय वळण आले होते. या भेटीत त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली, यांनतर त्यांनी थेट पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. यांनतर त्यांनी मुंबईत येऊन, नाराज पदाधिकारी आणि समर्थकांना संबोधित करताना, पक्षबदलासोबतच इतर अनेक अफवांना पूर्णविराम दिला.
अभिष्टचिंतन : ८० तासांच्या सरकारचे दोन्ही शिल्पकार जन्मले एकाच ग्रह-मानात
यावेळी, “मुंडे साहेबांनी हा पक्ष राज्य वाढवलेला असल्याने, मी हा पक्ष सोडणार नाही आणि तुम्हालाही सोडून देणार नाही,” असं म्हणत त्यांनी सर्वांचे राजीनामे नामंजूर केले. तसेच, माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि जे पी नड्डा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या मनात वेगवेगळ्या शंका उपस्थित झाल्या, तसेच मुंडे-फडणवीस यांच्यातील वाढणारी दरी देखील अनेकांच्या लक्षात आली.
जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करा! भाजपची आक्रमक मागणी
यानंतर, आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, “फडणवीस यांनी आणि मी एकत्र काम केलं आहे. ते राजकीय पटलावर माझे सहकारी आहेत. मुख्यमंत्री म्हणून माझे बॉस आहेत. मात्र, मी राष्ट्रीय सचिव असल्याने, राजकारणात माझे नेते राष्ट्रीय स्तरावरील आहेत.मी त्यांच्या टीममध्ये काम करते. म्हणून मोत्यांची नवे घेतली आणि त्यांची जाऊन भेट घेतली आणि त्यांचा जो काही निर्णय असेल, तो मला मान्य आहे,” असं म्हणत आपल्या त्या वक्तव्याचे पुन्हा एकदा समर्थान केले आहे.
आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल केल्यावरच फायदा होईल – अशोक चव्हाण
दुसरीकडे, राज्य भाजप आणि मुंडे भगिनी, तसेच फडणवीस आणि भाजप नेते यांच्यातील संघर्ष कधीही लपून राहिलेला नाही. भाजपमध्ये कायम ओबीसींना दुय्यम समजले जाते, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोप आधी भाजपत असलेल्या आणि आता भाजप बाहेर आसलेल्या अनेक ओबीसी नेत्यांनी केला आहे. त्यामुळे आता मुंडे-फडणवीस यांच्यातील हा शीत संघर्ष भाजप आणि राज्याच्या राजकारण पुढे काय रंग उधळतो, हे पाहणे महत्वाचे आहे.
Read Also :
- ठाकरे सरकार उचलू शकते मोठे पाऊल! दोन डोस घेतलेल्यांना मिळणार ही सवलत
- मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचे सामर्थ्य सत्ताधारी शिवसेनेतच; भाजपाची खोचक टीका
- गुन्हेगारांना होर्डिंग लावायला मी सांगितलं होतं का?, अजित पवार भडकले
- केंद्र सरकार म्हणतंय…”देशात ऑक्सिजन अभावी लोकांचे मृत्यू नाहीत”, विरोधकांकडून हल्लाबोल
- ओबीसी आरक्षण देण्याची केंद्राची भूमिका नाही, आता भाजपने बोलावं – विजय वडेट्टीवार