बीड : बीड जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर जात आहे. शिवाय अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. याप्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील रुग्णालयातील एकाच ऍम्ब्युलन्समध्ये २२ जाणांचे मृतदेह कोंबून त्यांची विटंबना करण्यात आली होती. ह्या भयानक घटनेबद्दल दु:ख व्यक्त करावं, की त्यांच्या मृतदेहाची विटंबना केल्याबद्दल संताप व्यक्त करावा, हे मला कळत नाही, अशा शब्दात अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले.
या प्रकरणी बीड जिल्ह्याच्या प्रशासनाने हात झटकले असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाय, महाराष्ट्र शासनानं सध्या अत्याचार करायचं ठरवलंय. हे कॉम्बिनेश बीड जिल्ह्याच्या भविष्यासाठी आणि आत्ताच्या परिस्थिती अत्यंत भयानक आहे, असे म्हणत अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंनी पालकमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.
त्यामुळे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड जिल्ह्याकडे जातीनं लक्ष द्यावे, अशी विनंतीही पंकजा यांनी केली आहे.
#COVID19 संदर्भात @CMOMaharashtra ला पत्र लिहून सूचना केल्या. pic.twitter.com/XO0LH619EC
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 27, 2021