मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने यंदा हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता थेट जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. मात्र केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयावर टीका होताना दिसत आहे. काँग्रेसने या निर्णयाबाबत सर्वपक्षांशी चर्चा केली नसल्याचे म्हटले आहे. तर काही दिवसांपुर्वीच शिवसेनेत प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी देखील मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.
अनेक राज्यात निवडणुका झाल्या, त्यासाठी मोठ्या सभा घेण्यात आल्या. मात्र आता संसदचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आल्याने मातोंडकर यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
A state election has taken place..huge rallies roared for the same. Entire country has pretty much reopened except the #Parliament where laws r bulldozed without all party consultations anyway #TooMuchDemocracy indeed pic.twitter.com/IGuTB2tjti
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 15, 2020
मातोंडकर यांनी टीका केली की, राज्यात निवडणुका घेण्यात आल्या. त्यासाठी प्रचंड मोठ्या सभा घेण्यात आल्या. सर्व पक्षांच्या चर्चेशिवाय जिथे कायदे लादले जात आहेत, ती संसद वगळता संपूर्ण देश खुला झाला आहे. खरोखरच खूपच लोकशाही आहे, असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अनुकूलता दर्शवल्याचा दावा त्यांनी केला आहे.