मुंबई : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ३०० भारतीयांची केंद्र सरकारने जासूसी केल्याचा आरोप, विरोधकांनी मोदी सरकारवर केला असून, हॅकिंगद्वारे या सर्वांवर पाळत ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या ३०० मध्ये ४० पेक्षा जास्त पेशाने पत्रकार असून, न्यायाधीश, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योगपती आहेत, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
मोदी-शहांवर सामनातून टीका: पेगॅसस’चा हल्ला हा आणीबाणीपेक्षा भयंकर
दरम्यान, यावरून आता काँग्रेस अधिकच आक्रमक झाली असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, “पेगॅसस हेरगिरी प्रकरणातील सत्य जनतेसमोर यावं, यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत याची चौकशी व्हावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. याप्रकरणात आता राष्ट्रपतींनी लक्ष घालावं, या मागणीसाठी उद्या राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनाबाहेर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे,” असं सांगत त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला आहे.
“विरोधकांकडून भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा कट”, पिगॅसस प्रोजेक्टवरून फडणवीसांचा गंभीर आरोप
तसेच, “या सॉफ्टवेअरचा वापर करूनच, फोन टॅपिंग झालं असून, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यात आलं आहे, अशी माहिती येत आहे. केंद्र सरकारने सुरक्षा यंत्रणांचा गैरवापर केला आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे आणि हे संवैधानिक व्यवस्थेविरोधातील असंवैधानिक कृत्य आहे. त्यामुळे, या प्रकरणातील संबंधितांनी राजीनामा द्यायला हवा,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
धक्कादायक! मोदी सरकारचा देशाच्या सुरक्षेशी खेळ? विरोधकांनी केला हेरगिरीचा भांडाफोड
दरम्यान, भाजप नेत्यांकडून या आरोपांचे खंडण केले जात असून, आज पत्रकार परिषद घेऊन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या आरोपांचं खंडण केलं आहे. “संसदेचं अधिवेशन, रणनीती करून आणि खोट्या बातम्या पेरून डिरेल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. अधिवेशनाच्या कामात अडथळे आणले जात आहेत. याआधीच सरकारने, आपली कोणतीही एजन्सी नाही, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, हे जाणीवपूर्वक भारताला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे,” असा गंभीर आरोप केला आहे.
Congress demands Supreme Court judges should investigate this matter (Pegasus) & truth should come out. We will hold a protest in front of the Governor's house tomorrow & will request for President's intervention in the matter: Maharashtra Congress President Nana Patole pic.twitter.com/vR1uu0rAIu
— ANI (@ANI) July 21, 2021
काय आहे ‘पेगॅसस’? सामान्यांसाठी उपलब्ध आहे का?
हे सॉफ्टवेअर फक्त सरकार किंवा सरकारी संस्थानाच वापर करण्यासाठी कंपनी विकते. सामान्य नागरिकांना ते वापरण्यासाठी उपलब्ध नाही.
“हुकूमशाही सरकारकडून संविधानाचा अवमान”, राष्ट्रवादीचा हल्लाबोल; दिली आंदोलनाची हाक
कसं काम करतं ‘पेगासस’?
ज्या व्यक्तीच्या फोनला हॅक करायचं आहे. त्या व्यक्तीच्या फोनमध्ये ‘पेगासस’ इन्स्टॉल करण्यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. यात जास्त करून, ज्या फोन यूजर्सला टार्गेट करायचं आहे, त्याच्या फोनवर एक एक्स्प्लॉईट लिंक पाठवली जाते. आणि जसं त्या लिंकवर यूजर क्लिक करतो, सॉफ्टवेअर आपोआप इन्स्टॉल होतं.
मोदींच्या काळात फोन टॅप झाले नाही, मनमोहन सिंगांच्या काळात झाले – फडणवीसांचा दावा
व्हॉटस अपमध्येही इन्स्टॉल होतं?
हॅकर्सनी व्हाटस अपचा वापर करुन २०१९ मध्ये पेगासस इन्स्टॉल केलं होत. त्यावेळेस हॅकर्सनी व्हॉटस अपच्या व्हीडीओ कॉल फिचरमध्ये एक बग शोधून काढून, त्याच्या आधारे नकली व्हाटस अप अकाऊंटवरुन टार्गेटवर असलेल्या फोनवर व्हीडीओ कॉल केले. आणि एका कोडद्वारे या सॉफ्टवेअरला फोनमध्ये इन्स्टॉल केलं.
“काँग्रेसनेही कायम केला आहे यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर”, भाजपने आकडेवारी देत केला गंभीर आरोप
पेगासस नेमकी कोणती माहिती चोरतं?
पेगासस इन्स्टॉल केल्यावर हॅकर्स, तुमच्या फोनला कमांड देऊन, फोनचं नियंत्रण मिळवतात आणि हवी ती माहिती मिळवतात. यात अनेक खाजगी गोष्टी असू शकतात. जसे की पासवर्ड नंबर, कॉनटॅक्ट नंबर, तुमचं लोकेशन, कॉल्स, मेसेज इ. तसेच, ते पाहू शकतात, ऐकू शकतात, वाचू शकतात, फोनचा कॅमेरा, माईक वाटेल तेव्हा चालू करु शकतात.
का होतोय केंद्रावर नागरिकांची हेरगिरीचा केल्याचा आरोप? काय आहे नेमकं ‘पेगासेस’ प्रकरण; वाचा थोडक्यात
पेगासस एवढं फेमस का आहे?
- कमी बँडविथवर काम करु शकतो. फोनची बॅटरी खात नाही. मेमरी, त्यातला डेटा संपवत नाही, त्यामुळे विनासंशय फोन हॅक होतो.
- अँड्रॉईडच्या तुलनेत जास्त सुरक्षित. iOS लाही हॅक करु शकतो.
- फोन लॉकचा फरक पडत नाही.
Read Also :
- ऑक्सिजन अभावी मृत्यू राज्यातही नाही? भाजपने ठाकरे सरकारला पाडले उघडे
- या कारणामुळे जितेंद्र आव्हाडांवर गरजले अजित पवार, भर बैठकीत म्हणाले…
- उपमुख्यमंत्र्यांनंतर ‘अनलॉक’ बाबत राजेश टोपेंचेही सूचक विधान!
- फडणवीसांना माझे नेते मानण्याचा विषयच नाही कारण…पंकजा मुंडेंचे पुन्हा स्पष्टीकरण
- जे केंद्राने सांगितले तेच ठाकरे सरकारनेही केले आहे, “संजय राऊतजी, तुम्हालाच नाही, तर आम्हालाही धक्का बसलाय!”