मुंबई : जनतेच्या मूळ प्रश्नांवरुन सर्वांचे लक्ष विचलित करण्यासाठी ED ची कारवाई भाजप करत आहे. त्याला घाबरायची काहीच गरज गरज नसल्याचं वक्तव्यं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलं. तसेच जनतेचे प्रश्न घेऊन केंद्र सरकार विरोधात आम्ही लढणार असल्याचही त्यांनी सांगितलं. देशाच्या अंतर्गत प्रश्न असो वा बाहेरचे प्रश्न केंद्र सरकार फेल झालं असून ‘सगळे चोर आहेत’ ही भूमिका भाजप घेतं असल्याने त्यांची थट्टा व्हायला लागली आहे आणि त्यामुळे भाजपच्या नेत्यांना आता लोकं ‘कॉमेडी मॅन’ म्हणायला लागले आहेत असही पटोले म्हणाले.
देगलुरमध्ये भाजप उमेदवाराला निवडुण द्या, मी गाव जेवण देतो – चंद्रकांत पाटलांची ऑफर
तसेच अमित शाह यांच्या मुलाची संपत्ती नऊ पट वाढते त्यांना भीती वाटत नाही इतरांना कशी वाटेल? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हे सगळे तपास मोदींच्या काळातील पाप असून कसं ब्लॅककमेलिंग केलं, कसं पैसे उकळले या सगळ्याचे 2024 मध्ये बिंग फुटेल असही ते म्हणाले.
साखर कारखान्यांना ईडीने नोटीसा बजावल्या, पण त्यांच्यावर कारवाई होणार नाही – देवेंद्र फडणवीस
लसीलरणाच सेलिब्रेशन आधीच व्हायला हवं होतं म्हणजे लोकांचं जीव वाचले असते मात्र मादींनी आपल्या लसी दुसऱ्या देशात दिल्याच शिवाय लसीकरणाच राजकारण केलं जातं आहे इतकी जीवितहानी झाल्यावर 100 कोटी डोसच सेलिब्रेशन करणार, तर ज्या लोकांचा मृत्यू झाला त्याच सेलिब्रेशन करणार का? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची भेट साखरेच्या संदर्भात होती की कडू गोष्टीसाठी हे कळेल असा टोलाही त्यांनी फडणवीस आणि शहा यांच्या भेटीवरती लगावला आहे.
Read Also :
- उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात तब्बल अर्धातास खलबतं; दोन दिवसांत दुसऱ्यांदा भेट
- हिंमत असेल तर शिंगावर घ्या; नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा ललकारलं
- भ्रष्टाचाराची पाळंमुळं खणून काढणार, गरीबांना लुटणाऱ्यांना आमचं सरकार सोडणार नाही – नरेंद्र मोदी
- अजितदादा, मला परवानगी द्या, त्या किरीट सोमय्याला बघून घेतो – आमदार शशिकांत शिंदे
- शिवसेनेला लागली साडेसाती? एकनाथ शिंदे यांची ज्योतिषाकडे धाव, तर्कवितर्कांना उधान