नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षात कर्नाटकमधील लोकांनी अनेक यातना सहन केल्या आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर माध्यमांनी आमच्याबद्दल खुप लिहिलं आहे. परंतु आमच्यासोबत कर्नाटकमधील सर्वसामान्य जनता होती. त्यामुळे आम्ही याठिकाणी भ्रष्टाचाराला हरवू शकलो. असं काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या नव्या मंत्र्यांच्या शपथविधीला केलं आहे.
हेही वाचा…“अंधेरी रात में गया, और अंधेरी रात में वापस आया,” फडणवीसांची ‘दिल्ली’ वारी’ चर्चेत ?
आज कर्नाटच्या मुख्यमंत्रीपदासाठी काॅंग्रेसचे नेते सिद्धरमाय्या यांनी घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून डी.के शिवकुमार यांनी शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टलीन आणि यांच्यासोबत काॅंग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी राहूल गांधी यांनी जनतेला संबोधित करतांना कर्नाटकच्या जनतेचं आभार मानले.
हेही वाचा…काॅंग्रेसचा नागपुरचा ‘वजीर’ भाजपमध्ये जाणार ? फडणवीसांनीच लावली फिल्डिंग , एकेकाळी त्यांनाच दिली होती टक्कर
गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचार सहन केला. आम्ही रॅलीदरम्यान म्हटलं होतं की द्वेषाला हरवलं आणि प्रेम जिंकलं आहे. द्वेषाच्या बाजारात कर्नाटकच्या लोकांनी प्रेमाचं दुकान उघडलं आहे. आम्ही तुम्लाहा पाच आश्वासने दिली होती. गृहलक्ष्मी योजना- दोन हजार रूपये प्रत्येक महिलेला. गृहज्योती योजनेतून २०० युनिट वीज मोफत. अन्नभाग्य योजनेतून १० किलो तांदूळ प्रत्येक कुटुंबीयाला, शक्ती योजनेतून महिलांना संपुर्ण कर्नाटकात मोफत बसप्रवास. युवानिधी योजनेतून तीन हजार रूपये प्रत्येक ग्रॅज्यऊएट्स आणि १५०० रूपये डिल्पोमाधारकाला मिळणार. असंही राहुल गांधी यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…“आदुबाळ, तुझ्या जन्माच्या आधीपासून शिंदे साहेब…”शिंदे गटाने आदित्य ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…मुनगंटीवारांनी दिलेलं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्विकारलं, आता मोठा राजकीय धमाका होणार ?
हेही वाचा…उद्याच होणार राज्यातील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार! फडणवीसांच्या दिल्लीवारीत यादीला हिरवा कंदील?
हेही वाचा…“राष्ट्रवादीचे अनेक खासदार, आमदार आमच्या संपर्कात, निवडणुकीआधी….” भाजप मंत्र्यांचा मोठा दावा
हेही वाचा…“हे असले निर्णय देशाला परवडणारे नसतात”, नोटबंदीवरून राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात