मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद आता शिगेला पोहोचला आहे. या वादात दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप सुरु असताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना फटकारले आहे. दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरे यांच्याविषयी बोलू नये. त्यांची तेवढी लायकीही नाही, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.
“पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवांनाही सोडलं नाही”, मोदी मंदिरावरून उपमुख्यमंत्र्यांचा शाब्दिक टोला
संदीप देशपांडे शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर आगपाखड केली. राष्ट्रवादी नाव असणारा पक्ष महाराष्ट्रात अतिश्य संकुचित आणि जातीपातीचं राजकारण करत आहे. मनसेला त्यांच्याकडून शिकायची गरज नाही. राज्यात जातीपातीचं विष पेरणारे हे लोक महाराष्ट्रद्रोही असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले. त्यांच्या या टीकेचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या दिशेने होता.
शिवसेनेच्या कृतीची फडणवीसांनी केली तालिबानशी तुलना, म्हणाले…
राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करून “राष्ट्रद्रोह” केला ती व्यक्ती! अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे’, अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना जोरदार टोला लगावला होता.
Read Also :
- २५० कोटींच्या कथित घोटाळ्याची चौकशी होणार; अनिल परब यांच्या अडचणी वाढणार?
- पिंपरी चिंचवड लाचखोरी प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार; चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
- “राणे कुणाच्या धमक्यांना घाबत नाहीत, ते सेनेला जशास तसे उत्तर देतील”, कराडांचा इशारा
- माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी “भारतीय लोकशाहीचे आदर्श नेते”- गडकरी
- राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर केलेल्या जातीयवादाच्या आरोपाला, शरद पवारांचे सडेतोड उत्तर