महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या पारनेरच्या पाच नगरसेवकांची चारच दिवसात शिवसेनेत घरवापसी झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर या नगरसेवकांनी पुन्हा शिवबंधन बांधले. चारच दिवसात त्यांची सेनेत घरवापसी झाली. या राजकीय नाट्यावर निलेश राणे यांनी परखडपणे टीका करत चांगलाच समाचार घेतला आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत जाहीर टीका केली आहे. ‘या अशा कारणांमुळेच सामान्य लोक राजकारण्यांवर फक्त थुंकायचे शिल्लक राहिलेत. संकटांचा डोंगर समोर दिसतानासुद्धा सत्ताधारी लंगडी, खो खो खेळतायत’, अशा शब्दांत टीका करत असतानाच हे कसं घडलं, अशी विचारणादेखील त्यांनी केली आहे.
या अशा कारणांमुळेच सामान्य लोकं राजकारण्यांवर फक्त थुंकायचे शिल्लक राहिलेत. संकटांचा डोंगर समोर दिसताना सुद्धा सत्ताधारी लंगडी खोखो खेळतायत.
Shivsena-NCP: हे कसं घडलं? पारनेरचे नगरसेवक पुन्हा शिवसेनेत https://t.co/rnIh7i3omm
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 8, 2020
दरम्यान, या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत चारच दिवसांपूर्वी शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधले होते, त्याच लंके यांच्या उपस्थितीमध्ये या नगरसेवकांनी मातोश्रीवर पुन्हा ‘शिवबंधन’ हाती बांधले.