मुंबई : काल मुंबईत शिवसेनेतील पक्षप्रमुखांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदेंवर जोरदार प्रहार केला. हिंमत असेल तर पुढच्या महिन्यात निवडणुका घेऊन दाखवा, असं आवाहन देखील ठाकरेंनी भाजपला दिलं. अशातच मुंबई महापालिकेने शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी मैदानाची परवानगी नाकारली आहे. यावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर प्रखरशब्दात टिका केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना ज्यापद्धतीने सुनावलं. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, काल फक्त ट्रेलर होता. एवढ्यात घाबरलात ? मैदानाची परवानगी नाकारून रडीचा डाव खेळू शकाल. पण उद्धव ठाकरे नावाचा दसरा जनतेच्या मनातील आत्मीयता शिवसेनेचा स्वाभिमानी बुलंद आवाज तो तुम्हाला कधीच दाबता येणार नाही असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला चांगलाचं सुनावलं.
कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’च्या शहरप्रमुख पदी गिरीश खत्री यांची निवड
दसरा मेळावा निमित्ताने शिवतीर्थावर सभा घेण्यासाठी दोन्ही बाजूंनी महापालिकेत अर्ज सादर केले होते. परंतु उद्धव ठाकरे यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यात अनेक राजकीय घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच परवानगी दिली नाही तर सील तोडून आत घुसू असा इशारा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी याआधीच दिला होता.
“पवार साहेब तुम्हीच सांगा..! 700 च्या वर मराठी कुटुंब बेघर झालेत त्याचं काय?”; भाजपचा सवाल
दरम्यान, महापालिका निवडणुक आली की गिधाडांना मुंबई दिसते, कारण ती त्यांच्यासाठी स्केअर फुटाने विकण्याची जागा आहे. आमच्यासाठी ती 105 वीरांच्या बलिदानातून मिळवलेली मातृभूमी आहे. ती आमची आई आहे आणि आईवर वार करायला आलेल्यांचा कोथळा आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला. काल शिवसेना प्रमुखांचा पक्ष मेळावा पार पडला त्यामध्ये ते बोलत होते.
Read also
- “उरलेला तुमचा करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
- “महापालिकेच्या सत्तेत असंख्य यशवंत, कीर्तिवंत भ्रष्टाचाराचे राक्षस उभे केलेत”; मनसेची टिका
- “हल्ली बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रात फिरतेय”; उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर निशाणा
- “निवडणुक आली की गिधाडांना मुंबई दिसते, हिंमत असेल तर, घ्या निवडणुक”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- “शिवसेना फुटल्याचं दु:ख आहे , तुम्हाला राष्ट्रवादी जवळची की पन्नास आमदार?” रामदास कदम