नवी दिल्ली : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. तर डिझेलचे दर देखील प्रचंड वाढले आहे. गेली सहा महिने इंधन दरात प्रचंड वाढ होत आहे. यावरून सरकारला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यातच आता पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी महाराष्ट्रात पेट्रोल सर्वात महाग का आहे, याचे कारण सांगितले आहे.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सातत्याने इंधन दरवाढीवरून सरकारवर निशाणा साधत आहेत. यावर आता धर्मेंद्र प्रधान यांनी उत्तर देत सरकार लसीकरणावर 35 हजार कोटी खर्च करत असल्याचे म्हटले आहे.
या संकटाच्या काळात इंधनाचे दर वाढल्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, केंद्र किंवा राज्य सरकारची सुमारे 35 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम कोरोना लसीकरणासाठी वर्षभरात खर्च होणार आहे. या संकटाच्या काळात सरकार कल्याणकारी योजनांवर पैसे खर्च करत असल्याचे ते म्हणाले.
राहुल गांधींना उत्तर देताना प्रधान म्हणाले की, राहुल गांधींना लोकांबद्दल एवढीच चिंता वाटत असेल ना तर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आदेश द्यावा. महाराष्ट्राचा देशात कर जास्त असल्यामुळे महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल आहे. राजस्थानचा कर पेट्रोलवर सर्वात जास्त आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
Read Also :
- ‘…तर येत्या आठ दिवसांत पुन्हा कडक निर्बंध लावणार’
- गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर पाळत, पोलिसांना तपासाचे आदेश
- कंत्राटदाराला घातली कचऱ्याने आंघोळ, संतप्त शिवसेना आमदाराचे प्रताप
- अभय बंग महान सामाजिक नेते, त्यांच्यामुळेच राज्य व्यसनमुक्त झाले; वडेट्टीवारांचा टोमणा
- राजकारण नव्हे; शिवसेनेची विचारधाराच चंचल झाली आहे- प्रवीण दरेकर