मुंबई: पोलिस दलात क्रीम पोस्टिंग आणि बदल्यांतील भ्रष्टाचारावर निगराणी ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग करण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. शुक्लांच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानींनी बाजू मांडली. सीआयडीच्या प्रमुख असताना शुक्ला यांना तत्कालीन पोलिस महासंचालकांकडून काही फोन नंबर्सवर निगराणी ठेवण्याचे आदेश मिळाले होते.
हे पण वाचा: भाजपसोबत युती नाहीच, नाशिकमध्ये मनसेचा स्वबळाचा नारा
पोलिस दलात मोक्याच्या ठिकाणी नियुक्ती आणि बदल्यांसाठी कार्यरत दलालांचे काही राजकीय नेत्यांशी लागेबांधे होते. गलेलठ्ठ रकमा घेऊन या बदल्या होत होत्या, असे जेठमलानी यांनी न्यायालयास सांगितले. न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे.जमादार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. पोलिस महासंचालकांच्या निर्देशानुसार शुक्ला यांनी तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचीही परवानगी घेतली होती.
हे पण वाचा: नागपुरात ‘बॅनर वॉर’, युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचं महापालिका मुख्यालयात आंदोलन
दरम्यान, १७ जुलै ते २९ जुलै २०२० दरम्यान निगराणी करण्याची परवानगी कुंटे यांनी दिली होती. २५ मार्च २०२१ रोजी कुंटे यांनी दिलेल्या अहवालातही हे नमूद आहे. मात्र नंतर परवानगी मिळवताना आपली दिशाभूल केली, असा दावा कुंटे यांनी करून शुक्ला यांना बळीचा बकरा बनवले, असा युक्तिवाद त्यांनी केला.
रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप काय?
एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. या प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, “केंद्र सरकारने काही नियम दिले आहेत. त्यात कोणत्या प्रकारात फोन टॅप करता येतात याविषयी सांगण्यात आले आहे. यात राष्ट्र घातक कृत्य, परकीय देशातील अतिरेकी संघटनेशी संबंध या प्रकारांशिवाय इतर परिस्थिती फोन टॅपिंग करता येत नाही. याला अपवाद येथील शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीचा फोन टॅप करु शकतो. त्यामुळे रश्मी शुक्ला यांनी जी कारणं दिली होती ती संयुक्तिक नव्हती. त्यांनी ज्या फोन टॅपिंगच्या परवानग्या घेतल्या त्या चुकीच्या नावाने घेतल्या होत्या. परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार करण्यात आला. यात अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. हा राईट टू प्रायव्हसीचा भंग आहे. हे अनेकवेळा करण्यात आलं.”
Read Also :
- कार्यकर्त्यांची भावनिक हाक, पंकजा मुंडेंनी शिवसेनेत जावे, पक्षात मुंडेना खडसेंसारखी वागणूक
- ‘पेगॅसस’ प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण, देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे, सामनातून केंद्र सरकारला सवाल
- भाजपसोबत युती नाहीच, नाशिकमध्ये मनसेचा स्वबळाचा नारा
- जम्मू-काश्मीर, हिमाचल, लडाखमध्ये पुराचे थैमान;, १६ ठार, बेपत्ता लोकांचा शोध सुरू
- नागपुरात ‘बॅनर वॉर’, युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचं महापालिका मुख्यालयात आंदोलन