मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ठाण्यात दफन भूमीसाठी राखीव असलेला भूखंड हडप केल्याचा आरोप करत ठाणेकरांच्या वतीने प्रताप सरनाईक यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
“सरकार पडल्यानंतर तिन्ही पक्षाच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय”; भाजप नेत्याची टिका
इडीची टांगती तलवार असल्याने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर सरनाईक यांना इडीकडून टॉप्स ग्रुप सर्व्हिेसेस अॅंड सोल्युशन या प्रकरणातून थोडासा दिलासा देखील मिळाला. यातच आता ओवळा-माजीवाडा मतदार संघ हा भाजपच्या माजी आमदाराला सोडावा, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. ओवळा-माजीवाडा हा मतदार संघ प्रताप सरनाईक यांचा असल्याने एकनाथ शिंदे आणि सरनाईक यांच्यात वाद निर्माण झाले आहेत.
“नागपुरची चड्डी ज्याने घातली, तो थेट संयुक्त सचिव पदावर जातो”; नाना पटोलेंचं वक्तव्य
विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील प्रताप सरनाईक यांच्यावर दबाब टाकत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच हा मतदार फोडण्यासाठी प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तींना भाजपकडून आमीष देखील दाखवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांना जाब विचार असल्यास त्यांच्यात शाब्दिक चकमक देखील बघायला मिळाली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आतापासूनच फटाके फोडत असल्याने शिंदे गटात चिंतेचं वातावरण तयार झालं आहे.
पोहरादेवीच्या यात्रेचा मुहूर्त साधून सेनेत प्रवेश..! बंजारा समाजाचे महंतांचा सेनेला पाठिंबा
दरम्यान, प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. त्यावरून राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसने त्यांच्यावर खोचक टिप्पणी देखील केली आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर असं म्हणत सत्ता आणि पदासाठी गद्दारी केलेल्यांनामध्ये हा वाद निर्माण होतोच. कारण गद्दारांच्या लालसेला मर्यादा नसते. असं म्हणत काॅंग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इडीपासून सुटका व्हावी म्हणून भाजपच्या नादी लागले. पण शेवटी पुन्हा भाजपने इडीची भिती घातलीच असा खोचक टोला देखील काॅंग्रेसने त्यांच्यावर लगावला.
Read also
- “मला कुत्रा निशाणी दिली तरी निवडून येईन, माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको”; अब्दुल सत्तार
- “जर RSS वर बंदी घालण्याची मागणी होत असेल तर…;”सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
- “शाळेत महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन झालेच पाहिजे”; छगन भुजबळांचा आग्रह
- “पेंग्विन सेनाच महाराष्ट्राची भरभराट करणार”; पेडणेकरांचं भाजपला जोरदार प्रत्युत्तर
- “शिवाजी पार्कवर काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते असणार”; भाजपने सेनेला डिवचलं