पिंपरी: राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण Pimpri-Chinchwad Navnagar Development Authority (पीसीएनटीडीए), Pune Metropolitan Region Development Authority पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) विलिनीकरणाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे महाविकास आघाडी सरकारने भूमीपुत्रांच्या जमिनी व्यावसायिक, बिल्डरांच्या घशात घालून मिळणारा मलिदा बारामतीला वळवण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे या पिंपरी चिंचवडकरांच्या जनहितासाठी भाजपचे शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे
Bhosari MLA Mahesh Landage आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप Chinchwad MLA Laxman Jagtap एकवटले असून प्राधिकरणाचे महानगरपालिकेमध्ये विलीनिकरण करण्यात यावे, अशी भूमिका घेतली आहे.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची १९७२ मध्ये स्थापना झाली. शहरात MIDC एमआयडीसीच्या स्थापनेनंतर कारखानदारीमुळे शहरात वास्तव्यास येणाऱ्या कामगार व गरीबांना परवडणाऱ्या दरात प्लॉटस व घरे उपलब्ध करुन देणे या उद्देशाने ही स्थापना करण्यात आली. प्राधिकरणासाठी शहरातील असंख्य शेतकऱ्यांच्या शेतजमिनी विकसनाच्या नावाखाली कवडीमोल दराने संपादित करण्यात आल्या. प्राधिकरण विलगीकरणाच्या निर्णयामुळे शहराच्या विकासाला खीळ बसणार असून विकास प्रकल्प रेंगाळणार असल्याची भीती आहे. तसेच, शहराला आता बकालपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अजित पवार आणि महाविकास आघाडी सरकार प्राधिकरण विलिनिकरणकरून भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका व तिचे सध्याचे वरील दोन्ही कारभारी आमदारांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पिंपरी महापालिका निवडणूक अवघ्या नऊ महिन्यांवर आली असल्याने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ सत्ता मिळवण्याच्या उद्देशाने प्राधिकरण विलगीकरणाचा घाट घातल्याचे बोलले जात आहे.
या विलीनीकरणामुळे पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी उपयोगी पडणाऱ्या प्राधिकरणाची सातशे कोटी रुपयांच्या ठेवी व वीस हजार कोटी रुपयांची जमीन पीएमआरडीकडे जाणार असल्याने शहरातील दोन्ही आमदार संतप्त झाले आहेत. त्याचा उपयोग पीएमआरडीए शहराबाहेर जिल्ह्यात इतरत्र म्हणजे बारामतीतही करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तशी शक्यता पालिकेचे महापौर माई ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे आणि सभागृह नेते नामदेव ढाके यांनी तर आज जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन वर्तवली आहे.
पिंपरी चिंचवडला शहराला औद्योगिकनगरी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पिंपरी महापालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत पालिका Pimpri Municipal Corporation is the richest corporation in Asia असलेली ओळख पुसली जाणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. शहराचे सौंदर्य आणि विकासात भर घालणारे अनेक विकासप्रकल्प प्राधिकरणाने शहरात उभे केल्याने एक वेगळी अशी ओळख पिंपरी-चिंचवडची झाली आहे. आता प्राधिकरणाच्या विलगीकरणाच्या निर्णायामुळे हे प्रकल्प होणार नाहीत. शहराचे सौंदर्य आणि विकासात भर घालणारे अनेक विकासप्रकल्प प्राधिकरणाने दिलेली ओळख कायम राहावी, पिपरी चिंचवडच्या विकासासाठी कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी भाजपचे दोन्ही पुढारी आमदार पिंपरी चिंचवड शहराच्या हितासाठी एकवले आहेत.